महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती विभागात कोरोनाचा कहर; महाविद्यालये सुरू होणार नाहीत - अमरावती कोरोना रुग्णसंख्या वाढ

जिल्ह्यासह संपूर्ण अमरावती विभागात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. बुधवारी 359 कोरोना रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी संबंधित सर्व विभागांची तडकाफडकी बैठक घेतली असून कोरोनाला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

Shailesh Nawal
शैलेश नवाल

By

Published : Feb 12, 2021, 10:56 AM IST

अमरावती - 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याबाबत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने मागितलेली परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारली आहे. आणखी 2 आठवडे महाविद्यालये बंदच राहतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. शाळा सुरू करणे बंधनकारक नाही असेही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी म्हटले आहे. अमरावती विभागात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाविद्यालये सुरू होणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले
विभागात अमरावती जिल्हा आघाडीवर -

मधल्या काळात अमरावती जिल्हा कोरोनामुक्त होत असल्याचे वातावरण होते. आता अचानक पुन्हा कोरोना वाढला असून अमरावती विभागात यवतमाळ, अकोला या जिल्ह्यातही कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. विभागात सध्या अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलयाची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. अमरावती शहरातील राजापेठ, बेलापूर, दस्तुरनगर, साई नगर आणि रुक्मिणी नगर या भागात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या भागात घरो-घरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे.

3 दिवसात सव्वा लाख रुपयांचा दंड वसूल -

गेल्या तीन दिवसांपासून शहरात दररोज दोनशे पेक्षा जास्त कोरोना रूग्ण आढळत आहेत. प्रशासनाने मास्क विना फिरणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. कारवाई दरम्यान तीन दिवसात सव्वा लाख रुपये दंड वसूल केले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. प्रत्येक व्यक्तीने मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details