महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 31, 2022, 8:05 PM IST

ETV Bharat / state

Amravati Graduate Constituency: अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी आचारसंहिता लागू

Amravati Graduate Constituency: अमरावती पदवीधर मतदार संघ सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. (Amravati Graduate Constituency Election) निवडणुक आयोगाने (Election Commissions) या मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केल्यापासून ते या निवडणुकीचा निकाल जाहिर होईपर्यंत निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागू राहील.

Amravati Graduate Constituency
पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी आचारसंहिता लागू

अमरावती: अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी मतदान (Code Conduct applicable) आणि 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. (Amravati Graduate Constituency Election) निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 5 जानेवारी 2023 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. 12 जानेवारीपर्यंत नामनिर्देशन पत्रे सादर करता येतील. (Constituency Election) 13 जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येईल. (Election Commissions) 16 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे, 30 जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी करण्यात येईल.

या निवडणुकीच्या आदर्श आचार संहिता कालावधीमध्ये निवडणुक प्रचारार्थ कार्यासाठी किंवा निवडणुकीशी संबंधीत दौऱ्यासाठी मंत्री, राज्यमंत्री, स्थानिक स्वराज संस्थांचे पदाधिकारी, राजकिय पक्षाचे उमेदवार, इत्यादी व्यक्तींना शासकीय वाहनांचा वापर करता येणार नाही. अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आदर्श आचार संहितेचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे.

मतदारसंख्येत होणार वाढ:पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त ५ जानेवारीला अधिसूचना प्रसिद्ध करतील. त्यापूर्वी नोंदणी झालेले मतदार या यादीमध्ये राहणार असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले. याशिवाय उमेदवारी अर्ज प्रक्रियेपर्यंत मतदार नोंदणी करू शकतात. मात्र, मतदार यादीत नाव येण्यासाठी अंतिम दिनाचे पाच दिवसांपूर्वी नोंदणी आवश्यक आहे.

विभागात आचारसंहिता लागू:आयोगाद्वारा २९ डिसेंबरला ‘पदवीधर’साठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर विभागातील पाचही जिल्ह्यात आचारसंहितेचा अंमल सुरू झालेला आहे. त्यामुळे मतदारांवर प्रभाग करणारी कोणतीही कृती करता येणार नाही. दोन महिन्यांपासून सुरू असलेली ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता २० डिसेंबरला संपुष्टात आल्यानंतर आठ दिवसांत पुन्हा ‘पदवीधर’साठी लागू झालेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details