महाराष्ट्र

maharashtra

शेतकऱ्यांच्या उपोषणाला व्यापाऱ्यांचाही दुकाने बंद ठेऊन पाठिंबा

By

Published : Sep 3, 2019, 8:17 PM IST

वरूडमधील केदार चौक परिसरात 1सप्टेंबरपासून सुरू असलेल्या आत्मक्लेश आमरण उपोषणाला व्यापारी संघ, व्यापारी संघटना, कृषी साहित्य विक्रेता संघ, सुवर्णकार संघ आदी व्यावसायिकांनी पाठिंबा देऊन समर्थन जाहीर करत मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत स्वयंस्फुर्तीने आपली दुकाने बंद ठेवली. वाळलेल्या संत्र्यांच्या झाडांच्या अनुदानासाठी हे आंदोलन सुरू आहे.

शेतकऱ्यांचे उपोषण

अमरावती- वाळलेल्या संत्रा झाडांच्या अनुदानासाठी 1 सप्टेंबरपासून आत्मक्लेश आमरण उपोषणाला वरुडमधील केदार चौकातून सुरुवात झाली. या शेतकरी हिताच्या उपोषणाला युवा व्यापारी संघ, व्यापारी संघटना, कृषी साहित्य विक्रेता संघ, सुवर्णकार संघ आदी व्यावसायिकांनी पाठिंबा देऊन समर्थन जाहीर करत मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत स्वयंस्फुर्तीने आपली दुकाने बंद ठेवली.

प्रतिक्रिया देताना शेतकरी


स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने वरुड येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ आत्मक्लेश आमरण उपोषण सुरू असून ३ दिवसानंतरही प्रशासकीय अधिकारी या मंडपाकडे जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे प्रशासनाविरोधात आक्रोश तयार होत आहे. या उपोषणाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भातील अध्यक्ष देवेंद्र भुयारांसह ऋषीकेश राऊत, गौरव गनोरकर, अरविंद माटे, अर्जुन डंभाळे, छत्रपती वड्बूदे, गंगाधार पांधरे, भूषण कराळे, जावेद शेख, रुपेश जिचकर, आदी कार्यकर्ते या आत्मक्लेश उपोषणाला बसलेले आहेत. मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत युवा व्यापारी, व्यापारी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आपला पाठिंबा दिला आणि स्वयंस्फुर्तीने आपली दुकाने बंद ठेवली

ABOUT THE AUTHOR

...view details