महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऐन पेरणीच्या तोंडावर शेतमालाच्या दरात मोठी घसरण, शेतकऱ्यांना बसतोय फटका

पैशाअभावी शेतकऱ्यांच्या शेतीच्या मशागतीचे कामे रखडले आहे. त्यात आता पेरणीसाठी पैसे हवे म्हणून शेतकरी आपला शेतमाल बाजार समित्यामध्ये नेत आहे. परंतु प्रत्येक शेतमालाचे भाव हे प्रतिक्विंटल पाचशे ते आठशे रुपयापर्यंत कमी झाल्याने मोठा फटका बसला आहे.सध्या बाजारपेठेत शेतकरी हरबरा, तूर, मुंग आदी शेतमाल घेऊन विकण्यासाठी घेऊन जात आहे. मात्र या पीकांचे दर घसरल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन, मुंग, तूर या पीकांच्या दरात ६०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे.

By

Published : May 30, 2021, 4:15 PM IST

शेतमालच्या दरात घसरण
शेतमालच्या दरात घसरण

अमरावती - मान्सून हा काही दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. त्यातच पैशाची जूळवाजूळव देखील शेतकरी करत आहे. घरी असलेला शेतमाल आता बाजारपेठेत विकायला नेत आहे. लॉकडाऊनमुळे बाजार समिती बंद होती. त्यात केंद्र सरकारने डाळ आयात केली आहे. त्यामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर शेतमालांचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे. त्यातच खतांच्या व बियाण्यांच्या वाढलेल्या किंमतीमुळे बियाणे खरेदी करतांना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना बसतोय फटका

दरात झाली घसरण

राज्यात मागील १५ महिन्यापासून कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. त्यात अमरावती जिल्ह्यातील बाजार समित्या सुद्धा काही दिवस बंद होत्या, त्यामुळे शेतकऱ्यांचा माल घरीच पडून होता. पैशाअभावी शेतकऱ्यांच्या शेतीच्या मशागतीचे कामे रखडले आहे. त्यात आता पेरणीसाठी पैसे हवे म्हणून शेतकरी आपला शेतमाल बाजार समित्यामध्ये नेत आहे. परंतु प्रत्येक शेतमालाचे भाव हे प्रतिक्विंटल पाचशे ते आठशे रुपयापर्यंत कमी झाल्याने मोठा फटका बसला आहे.सध्या बाजारपेठेत शेतकरी हरबरा, तूर, मूग आदी शेतमाल घेऊन विकण्यासाठी घेऊन जात आहे. मात्र या पीकांचे दर घसरल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन, मूग, तूर या पीकांच्या दरात ६०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे.


बियाण्याच्या किंमती वाढल्या

मागीलवर्षी सोयाबीन काढणीच्या वेळी पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली, तर कपाशीवरसुद्धा बोंड अळी आल्यामुळे कपाशीची उत्पन्न घटले. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बियाण्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच बियाणे कंपन्यांनी आपले दर मोठ्या प्रमाणावर वाढवले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता बियाणे खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे मोजावे लागणार आहे. महाबीजच्या बियाणाचाही मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे.


'केंद्र सरकारचे धोरण चुकीचे'

एकीकडे सरकारकडून सांगितले जाते, की शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढले पाहिजे. परंतु जेव्हा क्षेत्रात उत्पन्न वाढते, मालाचे भाव वाढते तेव्हा केंद्र सरकार मात्र शेतकऱ्यांचा मालाचे भाव हाणून पाडण्यासाठी शेतमाल आयात करते. त्यात आता आयात शुल्क फ्री केल्याने मोठ्या प्रमाणावर माल आयात होत आहे आणि याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी सांगितले आहे.

हेही वाचा-मुंबईकरांना दिलासा! 1 जूनपासून सम विषम पद्धतीने दुकाने उघडणार

ABOUT THE AUTHOR

...view details