अमरावती - मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरण हे विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाते. सध्या अप्पर वर्धा धरणातील पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयावर अमरावती शहर, मोर्शी ,वरुड व वर्धा जिल्ह्यातील आष्टीसह लहान मोठ्या गावांची तहान भागविली जाते. सध्या धरणात केवळ 13 टक्के इतकाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.
जलसंकट.. अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणात केवळ 13 टक्के जलसाठा - तळ
अप्पर वर्धा धरणातील पाणी पातळीत झपाट्याने घट झाली आहे. पाण्याअभावी वर्धा नदी पात्र जवळपास कोरडे पडले आहे. यावर्षी पाऊस झाला नाही तर नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
![जलसंकट.. अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणात केवळ 13 टक्के जलसाठा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3575533-thumbnail-3x2-amravati.jpg)
पाण्याअभावी वर्धा नदी पात्र जवळपास कोरडे पडले आहे. यावर्षी पाऊस झाला नाही तर नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. अप्पर वर्धा धरणातून अमरावती आणि मोर्शी शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी सोडल्या जाते . तर याच परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. मागील दोन वर्षातील कमी पर्जन्यमान यामुळे धरण पुरेसे भरले नाही. त्यामुळे यंदा धरणाने सर्वाधिक तळ गाठला आहे.
2008 नंतर कधीही या धरणाने तळ गाठला नव्हता. पण 2019 मध्ये ही परिस्थिती ओढवली आहे. विहिरी व बोअरवेल सुध्या कोरडेठाक पडले आहे. यावर्षी मृग जोरात न बरसल्यास भर पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.