महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

छत्तीसगडच्या दोन बहिणींची धावत्या रेल्वेतून आत्महत्या; अकोला जिल्ह्यात घटना - Two sisters from Chhattisgarh commit suicide

दोन्ही मृत मुली छत्तीसगड येथील रहिवासी ( deceased girls residents of Chhattisgarh ) आहेत. रागाच्या भरात त्यांनी घर सोडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दोघीही विद्यार्थीनीच्या गणवेशात ( two sisters suicide in Akola ) होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यातील मनारखेड रेल्वे चौकी परिसरात 19 वर्षीय दोन मुलींचा मृतदेह रेल्वे रुळावर ( Manarkhed railway station in Akola ) आढळून आले.

दोन बहिणींची धावत्या रेल्वेतून आत्महत्या
दोन बहिणींची धावत्या रेल्वेतून आत्महत्या

By

Published : Apr 1, 2022, 10:37 PM IST

अकोला - छत्तीसगडच्या दोन मावस बहिणींनी धावत्या रेल्वेतून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या मनारखेड रेल्वे चौकी परिसरातील ही घटना आहे. या दोघींनी मुंबई-कोलकाता रेल्वेतून बुधवारी रात्री पाठोपाठ उडी मारून आत्महत्या केली आहे. बेबी राजपुत आणि पूजा गिरी असे मृत मुलींची नावे आहेत.

दोन्ही मृत मुली छत्तीसगड येथील रहिवासी ( deceased girls residents of Chhattisgarh ) आहेत. रागाच्या भरात त्यांनी घर सोडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दोघीही विद्यार्थीनीच्या गणवेशात ( two sisters suicide in Akola ) होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यातील मनारखेड रेल्वे चौकी परिसरात 19 वर्षीय दोन मुलींचा मृतदेह रेल्वे रुळावर ( Manarkhed railway station in Akola ) आढळून आले. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.

बेपत्ता असल्याची केली होती तक्रार -अकोल्यातील उरळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवून पुढील तपास सुरू केला. बेबी राजपुत आणि पूजा गिरी या दोघी एकमेकींच्या मावस बहिणी आहेत. या दोन्ही मुलींनी चार दिवसांपूर्वी आयटीआयला जातो, असे सांगून घर सोडले, असल्याची माहिती आहे. त्यानंतर त्या दोघी घरी परतल्याच नाहीत. त्यांची शोधाशोध केल्यानंतरही त्यांचा सुगावा लागला नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी चापा पोलीस स्टेशन गाठले. त्याठिकाणी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट-मुंबई-कोलकाता रेल्वेमध्ये पुजा आणि बेबी या दोघी प्रवास करत असताना, दोघींनी रेल्वेतून पाठोपाठ उडी मारल्याचे समजते. यावेळी दोन्ही मुली आयटीआयच्या गणवेशात असल्याची माहिती आहे. आयटीआयमध्ये त्यांचे कोपाचे शिक्षण सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोपाची ऑनलाइन परीक्षा दिली. दरम्यान, या दोन्ही मुलींच्या आत्महत्या नेमके कारण अद्यापपर्यत कळू शकलेले नाही.

हेही वाचा-Mahavikas Aghadi Gov vs BJP : अखेर ठरले! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजपच्या नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम

हेही वाचा-'रशिया- जर्मनीचा मृत्यू.. अमेरिका, आफ्रिका आणि जपान एकमेकांसाठी जीव देण्यासही तयार..' पहा संपूर्ण कहाणी..

हेही वाचा-Home Minister On Raut : संजय राऊत यांची भावना योग्यच गृहमंत्री वळसे- पाटील यांच्याकडून दुजोरा

ABOUT THE AUTHOR

...view details