अकोला -अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला चांगले भाव मिळत असल्यामुळे शेतकर्यांनी साठवून ठेवलेली सोयाबीनची बिजवाई विक्रीस काढली आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. सध्या सोयाबीनचे भाव 4200 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर या सोयाबीनचा हमीभाव 3800 रुपये आहे. त्यामुळे जे शेतकरी बिजवाई विक्रीस आणत आहेत त्यांना फायदा होत आहे.
भाव नसल्याने साठवून ठेवले होते सोयाबीन -
अकोला जिल्ह्यातील खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे सोयाबीन अतिवृष्टीमुळे खराब झाले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हवा तसा भाव मिळाला नाही. 2800 ते 3000 रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे सोयाबीन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकले गेले. अनेकांनी सोयाबीन खराब झाल्यामुळे त्यावर ट्रॅक्टर फिरवला. तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्यास परवडत नसल्यामुळे ते तसेच शेतात पडून ठेवले. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन चांगले राहिले, त्यांनी ते घरी साठवून ठेवले. सध्या सोयाबीनचे भाव वाढले आहेत.
बाजार समितीत आवक वाढली -