महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात कृषी कायद्याविरोधात 'शिदोरी खावो' आंदोलन - कृषी कायदा 2020

केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन शेतकरी कायद्याला देशभरात विरोध होत आहे. शेतकरी जागर मंचाव्दारे जिल्ह्यातील 111 गावांमध्ये जाऊन यासंदर्भात विस्तृत चर्चा केली.

शेतकरी जागर मंच
शेतकरी जागर मंच

By

Published : Jan 1, 2021, 6:51 PM IST

अकोला - केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन शेतकरी कायद्याला देशभरात विरोध होत आहे. शेतकरी जागर मंचाव्दारे जिल्ह्यातील 111 गावांमध्ये जाऊन यासंदर्भात विस्तृत चर्चा केली. मेरा गाव मेरी संसद या अभियानामधून शेतकऱ्यांनी या केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यामुळे शेतकरी जागर मंचने हा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज 'शिदोरी खावो' असे अनोखे आंदोलन केले.

प्रशांत गावंडे

कृषी कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांची मते घेतली जाणून-

शेतकरी जागर मंचने 13 ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील 111 गावांमध्ये नवीन कृषी कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांची मते जाणून घेतली. त्यानुसार हजारो शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याला विरोध दर्शविला. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये या कायद्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. दिल्ली येथे गेल्या महिनाभरात पेक्षा जास्त काळ शेतकरी आंदोलन करीत आहे.

'शिदोरी खावा' आंदोलन-

मात्र, केंद्र सरकार त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवत आहे. या विरोधामध्ये शेतकरी जागर मंचने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 111 गावातील शेतकऱ्यांना सहभागी करत 'शिदोरी खावा' आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केंद्र सरकारच्या सरकारच्या कृषी कायद्याला विरोध दर्शविला. या आंदोलनामध्ये युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव कपिल ढोके, प्रशांत गावंडे, कृष्णा अंधारे, ज्ञानेश्वर सुलताने, सलिम खान यांच्यासह आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा-फेरीवाले अनधिकृत बांधकामाचा ऐका वरिष्ठ अधिकाऱ्यांला 3 करोडचा हप्ता, ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details