अकोला - अकोट तालुक्यात रविवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या पाऊसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. अनेकांच्या घरावरील छप्पर उडून गेले आहे. रस्त्यावर झाड पडल्याने रस्ते बंद झाले असून वाहनांवर झाडे पडली आहेत.
वडाळी देशमुख परिसरामध्ये फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान -
अकोट तालुक्यामधील वडाळी देशमुख परिसरामध्ये झालेल्या वादळी पाऊसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी पाऊस आणि गारपीट यामुळे लिंबू, पपई, केळी झाडे उन्मळून पडली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या फळबागा पाऊसाने नाहीशा केल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली.