महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raosaheb Danve Allegation on State Government : 'स्वतःचे अपयश लपविण्यासाठी मोठ्या नेत्यांची नक्कल सुरू' - रावसाहेब दानवे भास्कर जाधव

राज्य सरकार सर्वच प्रश्नांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे ते केंद्रीय नेत्यांवर आरोप करीत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे हे सरकार कोणत्या पातळीवर गेले आहे, हे यावरून दिसते. उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून ते मंत्रालयात कितीवेळा गेले हे पहिले पाहिजे, (Central Minister Raosaheb Danve on Bhaskar Jadhav ) असा टोला केंद्रीय राज्यंमत्री रावसाहेब दानवे यांनी लावला आहे.

Raosaheb Danve
केंद्रीय राज्यंमत्री रावसाहेब दानवे

By

Published : Dec 23, 2021, 7:06 AM IST

अकोला - राज्य सरकारने आपल्या कार्यकाळात विकासाची कामे केली नाही. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी ते असे नक्कल करीत आहेत, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Central Minister Raosaheb Danve on Bhaskar Jadhav ) यांनी भास्कर जाधव आणि राज्य सरकारवर केली आहे. ते अकोल्यात खासदार संजय धोत्रे ( Raosaheb Danve meet Sanjay Dhotre ) यांच्या भेटीला आले होते. यावेळी त्यांनी खासदार धोत्रे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

'स्वतःचे अपयश लपविण्यासाठी मोठ्या नेत्यांची नक्कल सुरू'

दानवे पुढे ते म्हणाले, राज्य सरकार सर्वच प्रश्नांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे ते केंद्रीय नेत्यांवर आरोप करीत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे हे सरकार कोणत्या पातळीवर गेले आहे, हे यावरून दिसते. उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून ते मंत्रालयात कितीवेळा गेले हे पहिले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लावला आहे. हे काही पहिल्यांदा झाले नाही. परंतु, त्यांची प्रकृती चांगली होवो, ही प्रार्थना करतो, असेही ते म्हणाले.

ओमीक्रॉन ( Omicron Variant ) संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून काळजी घेणार -

कोविड नियम अजूनही रेल्वे प्रशासनाने शिथिल केले नाही. केंद्र सरकारच्या नियमांचे पालन या ओमीक्रॉनच्या बाबतीत करण्यात येणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच बडनेरा येथील रेल्वे (Badnera Railway Station ) कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचा खासदार नवनवीन राणा केला आहे. त्यावर त्या कारखान्याला भेट देणार असल्याचे ते म्हणाले.

सरकार अपयशी...

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी म्हटले होते की मी महाराष्ट्रात संप होऊ देणार नाही. परंतु, हे सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटविण्यात अपयशी ठरले आहे. तसेच हे सरकार मराठा, ओबीसी आरक्षण, तसेच परीक्षांमध्ये भ्रष्टाचार करीत आहे. या भ्रष्टाचाराची तपासणी सीबीआय कडून होणे आवश्यक आहे. कारण हा भ्रष्टाचार कोणी एकाने केला नाही. या पाठीमागे सरकारमधील नेते तसेच अधिकारीही सहभागी असू शकतात, असा आरोप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details