अहमदनगर : नगर-सोलापूर महामार्गावर एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. आंबिलवाडी (ता.नगर) शिवारामध्ये झालेल्या या आपघातात तिघांचा मृत्यू झाला असून पाच जखमी झाले आहेत.
या अपघातात अरुण बाबुराव फुलसुंदर (वय ६०), अर्जुन योगेश भगत (वय १४) आणि तारा शंकर भगत यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तीनही मृत नगरचे रहिवासी आहेत. अपघातात रत्ना अर्जुन फुलसुंदर यांच्यासह चार जण जखमी झाले आहेत.