महाराष्ट्र

maharashtra

मरण पाहून सरणही थकलं..! कोपरगावमध्ये एकाच दिवशी 14 मृतदेहांवर अंत्यसंस्कार

By

Published : Apr 25, 2021, 10:55 AM IST

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य विभागाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. स्मशानातील चिता २४ तास धगधगत आहेत. कोपरगावमध्ये एकाच दिवशी 14 मृतदेहांवर अंत्यसंस्कार पार पडले.

Kopargaon corona victims cremation News
कोपरगाव कोरोनाबाधित अंत्यसंस्कार बातमी

अहमदनगर - 'मरण पाहून सरणही थकलं...' असेच काहीसा चित्र कोपरगाव येथील अमरधाममध्ये बुधवारी पहायला मिळाले. कोपरगावमध्ये एकाच दिवशी 14 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या 14 मृतदेहांवर कोपरगाव शहरातील अमरधामामध्ये अंत्यविधी पार पाडले. एका पाठोपाठ एक मृतदेह जळत असल्याचे विदारक चित्र समोर पाहून अनेकांचे मन सुन्न झाले. तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढतच चालला आहे.

कोपरगावमध्ये एकाच दिवशी 14 मृतदेहांवर अंत्यसंस्कार पार पडले

शासन-प्रशासन हतबल -

कोरोनाचा उद्रेक थांबवण्यासाठी शासन व प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत आहे. आत्तापर्यंत अनेक उपाय योजना करण्यात आल्या मात्र, अद्याप प्रभावी उपाय सापडलेला नाही. उलट पहिल्या लाटेपेक्षा सध्याच्या दुस-या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. कोपरगावमध्ये मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने अमरधाममध्ये अंत्यसंस्कारचे नियोजन देखील बिघडत चालले आहे. कोपरगावमध्ये 21 एप्रिल (बुधवारी) विदारक चित्र बघायला मिळाले. एकाच दिवशी 14 कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भीतीचे वातावरण -

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे वारंवार आवाहन करून देखील नागरिक गांभीर्याने पालन करत नाहीत. त्यामुळे शासनाला व प्रशासनाला कठोर पावले उचलावे लागली आहेत. राज्यभर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण अचानक वाढल्याने प्रत्येकाला आपला जीव मुठीत धरावा लागत आहे. एकाच दिवशी दोन आकडी संख्येत मृत्यू होत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्णाण झाले आहे.

हॉस्पिटलमधून मृत्यदेह आणण्यापासून अग्नी देण्यापर्यंतची सर्व कामे पीपीई कीट घालून करावी लागत आहेत. कोपरगाव नगरपरिषदेचे कर्मचारी ही सर्व कामे न थकता करत आहेत. मात्र, दररोज दिवसाला चार पेक्षा अधिक अत्यंसंस्कार होत असल्याने स्मशानभुमीमधील नियोजन बिघडत चालले आहे.

हेही वाचा -राज्यात नव्या 67 हजार 160 रुग्णांची नोंद, 63 हजार 818 जणांची कोरोनावर मात

ABOUT THE AUTHOR

...view details