महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 26, 2023, 7:44 PM IST

Updated : May 26, 2023, 9:10 PM IST

ETV Bharat / state

Samriddhi Highway : शिर्डी ते भरवीर समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, उपमुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती

शिर्डी ते भरवीर समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या माहामार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे. शिर्डी ते भरवीर हे जवळपास 80 किमीचे अंतर अवघ्या 40 ते 45 मिनिटात प्रवाशांना कापता येणार आहे.

Samriddhi Highway
Samriddhi Highway

समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

शिर्डी : समृद्धी महामार्गाच्या पहिल्या 520 किलोमीटरच्या टप्प्याचे शिर्डीपर्यंत उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शिर्डी ते भरवीर हे जवळपास 80 किमीचे अंतर अवघ्या 40 ते 45 मिनिटांत कापता येणार आहे. याशिवाय नागपूर येथून सुरुवात केल्यास अवघ्या पाच ते सहा तासांत नाशिकला पोहोचता येईल. मुंबई-नागपूर हे अंतर १८ तासांवरून केवळ ८ तासांवर आणणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या समृद्धीलाही हातभार लागणार आहे.

14 जिल्ह्यांना होणार फायदा :समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांतून जातो. याशिवाय चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर, रायगड या 14 जिल्ह्यांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण २४ जिल्हे या महामार्गाशी जोडले जाणार आहेत. या मार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवासाचे अंतर कमी होऊन मराठवाडा-विदर्भाच्या विकासालाही चालना मिळणार आहे. रोजगार, वाहतूक, व्यापार, उद्योगाच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील.

महामार्गाची एकूण लांबी 600 किमी : शिर्डी ते भरवीर या 80 किमी लांबीच्या दुसऱ्या टप्प्यात 7 मोठे पूल, 18 छोटे पूल, लहान-मोठ्या वाहनांसाठी 23 अंडरपास, पाठकर प्लाझा येथील 3 इंटरचेंज, 56 टोल नाके, 6 वा पूल यांचा समावेश आहे. 3 हजार 200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या दुसऱ्या टप्प्यात समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 600 किमी झाली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा भरवीर ते ठाण्यापर्यंत उरला आहे.

भाविकांचा प्रवासही वेगवान :शिर्डी ते भिवंडी या मार्गाचे काम अजूनही सुरू आहे. सिन्नर ते कसारा दरम्यान 12 आणि 16 छोटे पूल बांधले जाणार आहेत. इगतपुरी ते भिवंडी केळी आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबरमध्ये उघडणार असल्याची माहिती आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मुंबईकर महामार्गाचा संपूर्ण लाभ मिळणार आहे. सध्या लांबचा प्रवास करून शिर्डीला जावे लागते, त्यासाठी तीन ते चार तास लागतात. दुसऱ्या टप्प्यात सिन्नरच्या गोंदे इंटरचेंजवरून नाशिक, अहमदनगर, पुणे या भागात जाण्यासाठी महामार्गाचा वापर केला जाणार आहे. भरवीर इंटरचेंजपासून घोटी १७ किमी अंतरावर आहे. त्यामुळे नाशिक, ठाणे, मुंबई येथून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांचा प्रवासही वेगवान होणार आहे. आता केवळ पुढील 102 किमी महामार्गाचे काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा -

PM Narendra Modi Nagpur Visit : पंतप्रधान मोदी आणणार 'समृद्धी'; विविध विकासकामांचे उद्घाटन

Last Updated : May 26, 2023, 9:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details