महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये मनसे विद्यार्थी सेनेने लावले शहर नामांतराचे फलक - अहमदनगर नामांतर आंदोलन

अहमदनगर शहराचे नामांतर करून 'अंबिकानगर' हे नामकरण करावे, अशी मागणी होत आहे. शिवसेनेने ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केलेली आहे, अनेक हिंदुत्त्ववादी संघटनांनी अशीच मागणी वेळोवेळी केलेली आहे. याच मागणीचा मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहराच्या स्थापणादिनाचे औचित्य साधून पुढे रेटली आहे.

मनसेचे फलक
मनसेचे फलक

By

Published : May 28, 2021, 6:45 PM IST

अहमदनगर -शहराच्या 531व्या स्थापनादिनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहराच्या प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या कायनेटिक चौकात शहराचे नामकरण 'अंबिकानगर' करावे, या मागणीचे फलक लावून घोषणाबाजी केली. विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन छुप्या पद्धतीने आयोजित करून अचानक केल्याने एकच खळबळ उडाली.

मनसे विद्यार्थी सेनेने लावले शहर नामांतराचे फलक
स्थापना दिनी अंबिकानगरची मागणी

राज्यातील औरंगाबादसह अनेक शहरांच्या नामांतराची मागणी होत आहे. त्यासंबंधीचे फलक लावून अनेक ठिकाणी आंदोलने झाली आहेत. मध्यंतरी औरंगाबाद शहराच्या 'संभाजीनगर' नामांतर प्रश्न चर्चेत होता. त्याच धर्तीवर अहमदनगर शहराचे नामांतर करून 'अंबिकानगर' हे नामकरण करावे, अशी मागणी होत आहे. शिवसेनेने ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केलेली आहे, अनेक हिंदुत्त्ववादी संघटनांनी अशीच मागणी वेळोवेळी केलेली आहे. याच मागणीचा मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहराच्या स्थापणादिनाचे औचित्य साधून पुढे रेटली आहे. शहरातील कायनेटिक चौकात 'अंबिकानगर शहरात आपले स्वागत' अशा आशयाचे फलक लावण्यात आले.

तुळजाभवानी मातेचे माहेरघर बुऱ्हाणनगर

तुळजापुरच्या भवानी मातेचे माहेर म्हणून नगर जवळच असलेले बुऱ्हाणनगरची ओळख आहे. दसऱ्याला तुळजापुरला तुळजाभवानी मातेची पालखी-पलंग बुऱ्हाणनगर येथूनच नेण्याचा मान आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहराचे नाव 'अंबिकानगर' करावे, अशी काहींची मागणी आहे. दुसरीकडे शहर हे मोजक्या स्थापित शहरांपैकी एक असून 28 मे 1490ला अहमदशहा बहिरी यांनी या शहराची स्थापना केली, असा इतिहास असून त्या नावावरून शहराचे नाव अहमदनगर आहे.

हेही वाचा-चंद्रकांत पाटलांना वेगवेगळी स्वप्न पडण्याचा छंद, त्यावर मी काय बोलणार - जयंत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details