नेवासा (अहमदनगर) -शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) हा विश्वासू आणि कामाचा माणूस आहे. सोबत घेऊन काम करायचे असेल तर त्यांना मंत्री केले पाहिजे, असे उद्धव साहेबांनी सांगितल्याने शंकररावांना मंत्री केल्याचे गौरवोद्गार राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aditya Thackeray ) यांनी काढले. नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याने ( Sonai Mula Sugar Factory ) मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Minister Shankarrao Gadakh ) यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेल्या 80 कोटी रुपये खर्चाच्या डिस्टलरी व इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी 18 फेब्रुवारीला आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray Inaugrate Ethenol Project Sonai ) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
राजकारणातील प्रदूषण कोण?
मंत्री म्हणून ठोस कामे घेऊन जनतेसमोर जाणे हे माझी आणि शंकरराव यांची जबाबदारी आहे. कोविड संपू दे आणि नवीन महाराष्ट्र घडविण्याची ताकद दे हीच ईश्वराकडे मागणी आहे. लिक्विड झिरो डिस्चार्ज करून मुळा कारखान्याने झिरो लिक्विड डिस्चार्ज या तत्त्वावर यंत्रणा कार्यान्वित करून होणारे प्रदूषण रोखले आहे. तसेच राजकारणातील प्रदूषण महाराष्ट्रात आपण दूर ठेवलेले आहे. त्यांचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. रोज नवीन आरोप, रोज खालची पातळी, प्रत्येक ठिकाणी राजकारण सुरू आहे, आता राजकारणातील प्रदूषण कोणतं हे तुम्हीच ठरवा अशी कोटी भाजपचे नाव न घेता ठाकरे यांनी केली. मात्र, सत्तेचा माज न आणता आघाडी सरकार जनतेची कामे करीत आहे. कोविड काळात सरकारने चांगली कामगिरी केलेली आहे. शेतकरी, महिला व तरुणांसाठी सरकार काम करीत आहे. कोरोनामुळे होणार थेट संवाद खुंटला होता. तो आता सुरू झालेला आहे. येथे आल्यावर सर्वांची एकजूट दिसून आली. ती अशीच जपून ठेवा. पहिल्या दिवसापासून शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. ते अत्यंत विश्वासू व कामाचा माणूस असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
कारखान्याला नोटीस हा राजकारणाचा भाग -