महाराष्ट्र

maharashtra

अहमदनगर- मुळा-भंडारदरा धरणात पाण्याची आवक.. भंडारदरा येत्या चार दिवसांत भरणार !!

By

Published : Aug 2, 2019, 12:01 PM IST

अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा आणि निळवंडे या तीनही प्रमुख धरणातील पाणीसाठा वाढताना दिसत आहे.

मुळा-भंडारदरा धरण

अहमदनगर -येथील मुळा-भंडारदरा धरणात पाण्याची आवक सुरु असल्याने भंडारदरा येत्या चार दिवसात भरणार असल्याचे चित्र आहे.

धरणातील पाणीसाठ्यात वाढ


अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या मुळा,भंडारदरा आणि निळवंडे या तीनही प्रमुख धरणातील पाणीसाठा वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात क्षमतेने सर्वात मोठे असलेल्या (२६ हजार टीएमसी) मुळा धरणात १५,०९० दलघफू (४५%) पाणी साठा आहे. भंडारदरा धरणात ९,१६५ दलघफु (83.02%) तर, निळवंडे धरणात ४,०५० दलघफु (४८.६१%) इतका पाणी साठा जमा झाला आहे.

धरणातील पाण्याची दलघफू/टीएमसी/टक्केवारी


१)भंडारदरा - ९१६५ ८३.०२%
२)निळवंडे - ४०४५ ४८.६१%
३)मुळा - १५०९० ४५.००%


एक ऑगस्ट आवक-प्रतिदिन (दलघफू)


१)भंडारदरा - ४३०
२)निळवंडे - ३०६
३)मुळा - १०००

ABOUT THE AUTHOR

...view details