अहमदनगर -नगर शहरातील आप्पू चौकात असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्या सभोवताली अनेक जाहिरातींचे मोठे होर्डिंग्ज लागले असून त्यामुळे या ठिकाणी असलेला पं. नेहरू यांचा पुतळा दिसेनासा झाला आहे, याबाबत महानगरपालिकेला निवेदन देऊनही होर्डिंग्ज हटवण्याची कारवाई होत नसल्याचा निषेध म्हणून आज महानगरपालिकेतील आयुक्तांच्या दालनाबाहेर काँग्रेस पक्षाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
...तर तीव्र आंदोलन
ही होर्डिंग्ज तातडीने न काढल्यास येत्या 12 जानेवारी रोजी काँग्रेस कार्यकर्ते स्वतः ही होर्डिंग्ज काढतील आणि तीव्र आंदोलन करतील असा इशारा पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे. 31 डिसेंबर रोजी काँग्रेसच्या विद्यार्थी शाखेने इशारा देत आयुक्तांना निवेदन दिले होते, मात्र मनपा कडून कोणतीही कारवाई झाली नाही, त्यामुळे आज शहर जिल्हाध्यक्षांनी आयुक्त दालना बाहेर जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले.