महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर : विद्यार्थ्यांनी स्वत:च बनवले गणपती; अशोक डोळसे यांचा पर्यावरणपूरक उपक्रम - शाडूची माती

गणेशाची मूर्ती बनवताना ती पर्यावरणपूरक असावी. ती पाण्यात विरघळणाऱ्या शाडूची माती आणि नैसर्गिक रंगांपासून बनलेली असावी, याकडे सध्या जास्त कल दिसून येत आहे. नगरमधील कला शिक्षक असलेले अशोक डोळसे हे शिल्पकार गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कलाश्री दालनात पर्यावरणपूरक गणपती बनवण्याच्या कार्यशाळा घेत आहेत.

कलाशिक्षक अशोक डोळसे

By

Published : Aug 30, 2019, 5:24 PM IST

अहमदनगर -१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती अर्थात गणेशाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी घरोघरी तयारी सुरू आहे.

गणपती बनवण्यात मग्न असलेले विद्यार्थी
स्थापना करण्यासाठी बाप्पांची मूर्ती ही आकर्षक आणि लोभस असावी, असा सर्वच गणेशभक्तांचा आणि त्यातही लहानग्यांचा आग्रह असतो. गणेशाची मूर्ती बनवताना ती पर्यावरणपूरक असावी. ती पाण्यात विरघळणाऱ्या शाडूची माती आणि नैसर्गिक रंगांपासून बनलेली असावी, याकडे सध्या जास्त कल दिसून येत आहे.यासाठी अनेक गणेश उपासक असलेले शिल्पकार प्रयत्नशील असतात. नगरमधील कला शिक्षक असलेले अशोक डोळसे हे शिल्पकार गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कलाश्री दालनात गणपती बनवण्याच्या कार्यशाळा घेतात. तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणीही ते कार्यशाळेच्या माध्यमातून शाडूच्या मातीपासून 'स्वतःचा गणपती स्वत:च बनवा' हा उपक्रम राबवत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details