महाराष्ट्र

maharashtra

Ajit Pawar Reply Raj Thackeray : 'अचानक बाहेर निघायचं अन् भोंगे बंदची भाषा करायची, आतापर्यंत झोपले होते का?'

By

Published : Apr 6, 2022, 5:50 PM IST

राज्यात काहीजण अचानक बाहेर निघतात आणि अचानकच भोंगे बंद (Masjid Loudspeakers) करण्याची भाषा करतात. मग हे एवढे दिवस काय झोपा काढत होते का?, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाव न घेता राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह भाजपला लगावला आहे. अजित पवार आज शिर्डी आणि कोपरगाव दौऱ्यावर आले होते.

Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार

शिर्डी(अहमदनगर) - सध्या महाराष्ट्रातील राजकारण बदलत चालले आहे. राज्यात काहीजण अचानक बाहेर निघतात आणि अचानकच भोंगे बंद (Masjid Loudspeakers) करण्याची भाषा करतात. मग हे एवढे दिवस काय झोपा काढत होते का?, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाव न घेता राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह भाजपला लगावला आहे. अशाच वेगवेगळ्या गोष्टी पुढे आणायच्या व विकासाला महत्त्व देण्याऐवजी वेगळी चर्चा समाजात घडवून आणायची, समाजात दरी कशी निर्माण होईल याकडे लक्ष दिले जाते, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

भोंग्यांच्या गोष्टी करून विकास होत नाही - आपण किती वर्षांपासून महाराष्ट्रात गुन्यागोविंदाने राहत आहोत. एकमेकांच्या सणांचा आदर करत आहोत. एकमेकांना शुभेच्छा देत आहोत. ही आपली संस्कृती आणि हीच आपली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आहे. शाहू-फुले-आंबेडकरांनी हाच विचार मांडला आहे. अशा भोंग्यांच्या गोष्टी करून विकास होत नाही, अशी टीकाही राज ठाकरे यांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

पोलिसांच्या सोयी-सुविधांसाठी अधिकचा निधी - पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाबरोबरच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरे मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे‌. पोलिसांच्या सोयी-सुविधांसाठी जुलै महिन्यातील अधिवेशनात अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे अजित पवार शिर्डीत म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ आज शिर्डी आणि कोपरगाव दौऱ्यावर होते.

शिर्डीच्या विकासासाठी 150 कोटींची तरतूद - शिर्डी शहर व परिसराचा विकास करण्यासाठी शिर्डी विमानतळाचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी 150 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे‌. त्यातून कॉर्गा टर्मिनल, नाईट लॅडींग या सुविधा सुरू करण्यात येतील. यातून कृषी मालाची वाहतूक जलदगतीने होईल. यावर्षी शिर्डी, नवी मुंबई व सिंधुदुर्ग या विमानतळांना ग्रीन फिल्ड दर्जा देण्यात आला असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details