महाराष्ट्र

maharashtra

कोणाची होणार अहमदनगर महानगरपालिका? भाजपकडे उमेदवारच नाही, तर राष्ट्रवादीला महापौरपदाची आस

पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला साथ दिली होती. त्यामुळे भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांना महापौरपदाची संधी मिळाली. परिणामी सर्वाधिक संख्याबळ असूनही शिवसेनेला विरोधात बसावे लागले. आता मात्र, महापौरपदासाठी पुढील वर्षांचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी आहे. भाजपकडे त्यासाठी उमेदवारच नाही.

By

Published : Nov 14, 2019, 12:29 PM IST

Published : Nov 14, 2019, 12:29 PM IST

अहमदनगर महानगरपालिका

अहमदनगर -महापौर पदासाठी बुधवारी संपूर्ण राज्यात सोडत काढण्यात आली. अहमदनगर महानगरपालिकेत पुढील महापौर पदाचे आरक्षण अनुसुचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी निघाले आहे. त्यामुळे अनुसुचित प्रवर्गातील महिला नगरसेविकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. अहमदनगर महानगरपालिकेत महापौर पदासाठी भाजपकडे उमेदवारच नसल्याने भाजपच्या आशा मावळल्या आहेत.

कोणाची होणार अहमदनगर महानगरपालिका?


मागच्या वेळी पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला साथ दिली होती. त्यामुळे भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांना महापौरपदाची संधी मिळाली. परिणामी सर्वाधिक संख्याबळ असूनही शिवसेनेला विरोधात बसावे लागले. आता मात्र, महापौरपदासाठी पुढील वर्षांचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी आहे. भाजपकडे त्यासाठी उमेदवारच नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला अडीच वर्षांच्या काळासाठी महापौरपदाचे डोहाळे लागले आहेत.

हेही वाचा - पुण्याचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित, इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अवघ्या 14 जागा मिळवलेल्या भाजपला 18 जागांचा धनी असलेल्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. चार जागांचे बळ असलेल्या बसपच्या हत्तीचीही त्यांना साथ मिळाली. त्यामुळे एक आगळेवेगळे समीकरण तयार झाले. कमी जागा मिळूनही भाजपने महापौर व उपमहापौर ही दोन्ही पदे पटकावली.

हेही वाचा - नाशिकच्या माया सोनवणेच्या भेदक फिरकीने महाराष्ट्र क्रिकेट संघाचा विजय; तामिळनाडूवर केली मात

सध्या शिवसेना (24) व भाजप (14) एकत्र आल्यास युतीचे संख्याबळ 38 होते. मात्र, राज्यातील सरकार स्थापनेत शिवसेनेने घेतलेली भूमिका भाजपच्या दृष्टीने अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. शिवसेनेला बाजूला ठेवून काँग्रेस आघाडीसोबत भाजपने हातमिळवणी केल्यास सत्तेची गणिते जुळवता येतील. मात्र, विधानसभा निवडणुकांनंतर राज्यातील सत्ता समीकरणे कशी आणि कधी बदलतील हे सांगने कठीण झाले आहे. त्यामुळे अहमदनगर महानगरपालिका कोणाच्या ताब्यात जाणार हे येणारा काळच ठरवेल.

ABOUT THE AUTHOR

...view details