महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

थोरातांना युवकांची आणि महाराष्ट्राची माहिती आहे का? आदित्य ठाकरेंचा सवाल - बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कालच आदित्य ठाकरे हे जिल्ह्यात असताना युवा संवाद कार्यक्रमावर टीका केली होती. यावर आदित्य ठाकरेंनी अनेकांना महाराष्ट्र आणि तरुणांबद्दल माहिती नसेल अशा शब्दांमध्ये थोरातांना प्रत्युत्तर दिले.

थोरातांना युवकांची आणि महाराष्ट्राची माहिती आहे का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

By

Published : Jul 22, 2019, 9:05 AM IST

अहमदनगर - जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राज्यातील जनतेशी, शेतकरी वर्गाशी आणि तरुणांशी होत असलेला संवाद महत्त्वाचा असून जनतेतून मिळणारे प्रेम ही शिवसैनिकांनी केलेल्या कामाची पुण्याई असल्याचे मत, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.


जनआशीर्वाद यात्रा नगर जिल्ह्यात पोहोचली असून रात्री ही यात्रा दक्षिण नगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर इथे पोहचली. माझ्यासाठी पावसात लोक वाट पाहत आहेत, ही शिवसैनिकांची पुण्याई आहे असे सांगताना, पुढील सरकार हे भगवे सरकार असेल याचा आदित्य ठाकरेंनी पुनरुच्चार केला.


थोरातांना महाराष्ट्र माहीत आहे का?

काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कालच आदित्य ठाकरे हे जिल्ह्यात असताना युवा संवाद कार्यक्रमावर टीका केली होती. यावर आदित्य यांना विचारले असता त्यांनी अनेकांना मी डबल पदवीधारक असल्याचे माहीत नाही, आणि अनेकांना महाराष्ट्र आणि तरुणांबद्दल माहिती नसेल, अशा शब्दांमध्ये थोरातांना प्रत्युत्तर दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details