महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 30, 2019, 9:19 AM IST

ETV Bharat / state

यात्रेमुळे साठला ५ टन कचरा, तरुणांनी राबविले 'स्वच्छता अभियान'

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात रविवारी झालेल्या यात्रेमुळे तब्बल ४ ते ५ टन कचरा साठला होता. सोमवारी शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या कचऱ्याची विल्हेवाट लावली.

यात्रेनिमित्त साठला ५ टन कचरा, तरुणांनी राबविले 'स्वच्छता अभियान'

अहमदनगर - जिल्ह्यातील नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात रविवारी झालेल्या यात्रेमुळे तब्बल ४ ते ५ टन कचरा साठला होता. सोमवारी शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या कचऱ्याची विल्हेवाट लावली. या स्वच्छता अभियानात चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.

5 ton garbage in ahemadnagar, garbage clear by youngsters

कामिका एकादशी निमित्ताने रविवारी नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात मोठ्या प्रमाणात यात्रा भरल्याने मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. म्हणून मंदिर परिसरात शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या वतीने सोमवारी दि. २९ जुलै रोजी सकाळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या स्वच्छता अभियानात सुमारे चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांनी ओला व सुका असे मिळून पाच टन कचऱ्याची विल्हेवाट लावली. नेवासा तालुक्याचे माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते उदयन गडाख यांच्या उपस्थितीत 'हे विश्वची माझे घर' या माऊलींच्या संदेशाप्रमाणे परिसर व नेवासे क्षेत्र घर समजून हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या अभियानात शंकरराव गडाख मित्र मंडळाचे सुमार चारशे ते पाचशे कार्यकर्ते हे हँड ग्लोज घालून हातात झाडू घमेले खोरे घेऊन स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details