नवी दिल्ली -टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धा गाजवल्यानंतर भारतीय पॅरा अॅथलिट मायदेशी परतले. आज अवनी लेखरा आणि बॅडमिंटनपटू सुहास यथिराज भारतात आले. यावेळी त्याचे चाहत्यांसह कुटुंबीयांनी विमानतळावर जोरदार स्वागत केले.
टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी एकूण 19 पदके जिंकली. या कामगिरीसह भारत पदकतालिकेत 24 व्या स्थानावर राहिला. यात पाच सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कास्य पदकाचा समावेश आहे. आज पॅरा अॅथलिटची शेवटची तुकडी भारतात परतली. यात बॅडमिंटनपटू, शुटर तसेच तिरंदाज होते.
हरियाणाचे क्रीडामंत्री आणि माजी हॉकी खेळाडू संदीप सिंह यांच्यासह पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी खेळाडूंचे जंगी स्वागत केले.
याआधी रौप्य पदक विजेती टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलसह इतर खेळाडू आज सकाळी मायदेशी परतले आहेत. खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी विमानतळावर मोठी गर्दी केली होती. विमानतळ प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाने यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान, टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेले अॅथलिट गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत.
टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारे खेळाडू