महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 15, 2022, 6:52 PM IST

ETV Bharat / sports

T20 World Cup 2022 : टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडीवर आयपीएलचा परिणाम दिसणार का?

गेल्या वर्षी जेव्हा भारताने आयसीसी टी-20 विश्वचषक ( ICC T20 World Cup ) स्पर्धेत पाऊल ठेवले, तेव्हा एकतर अयोग्य किंवा फॉर्म नसलेल्या खेळाडूंच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले गेले होते. तसेच स्पर्धेतील खराब निकालामुळे त्याच्यावर नंतर टीकाही झाली होती.

Team India
Team India

नवी दिल्ली:गेल्या वर्षी 2021 इंडियन प्रीमियर लीगच्या आधी टी-20 विश्वचषकासाठी ( T20 World Cup ) संघ जाहीर करण्यात आला होता. तसेच काही निवडलेल्या खेळाडूंनी लीगमध्ये ज्या प्रकारे कामगिरी केली, त्यावरून भारत आयसीसी स्पर्धेसाठी किती तयार आहे, हे दिसून आले होते. त्यावेळी अनेक माजी क्रिकेटपटूंनी संघात बदल सुचवला होता, पण निवड समिती त्याच संघासोबत पुढे गेली आणि T20 विश्वचषकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात संघ बाहेर पडला.

आयपीएल 2022 सह, नेटिझन्सने पुन्हा त्यांचे मत मांडण्यास सुरुवात केली आहे आणि त्यांच्यापैकी काहींनी तर टी20 फॉरमॅटसाठी नवीन संघ तयार केला पाहिजे असे म्हटले आहे. निवड समितीने मोठ्या नावांच्या नव्हे तर खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे संघ निवडला पाहिजे, असे काहींनी सांगितले. एकाने ट्विटरवर लिहिले की, विश्वचषकासाठी संघात आम्हाला युवा खेळाडूंची गरज आहे. बीसीसीआय कृपया आयपीएलमधून खेळाडूंची निवड करा, कारण तरुण खेळाडू आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत आहेत. दुसऱ्याने लिहिले, आयपीएल बीसीसीआयला चांगले मार्गदर्शन करू शकते. या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक होणार आहे आणि या स्पर्धेसाठी भारताला सर्वोत्तम संघ निवडण्याची वेळ आली आहे.

विश्वचषकापूर्वी भारत 10 T20 सामने (5 दक्षिण आफ्रिकेसोबत, 2 आयर्लंड आणि 3 इंग्लंडसोबत) खेळणार आहे. या काळात अनेक तरुणांना शॉर्टलिस्ट करून संघात संधी दिली जाईल, असे मानले जात आहे. सध्याच्या आयपीएलमध्ये अनेक मोठे खेळाडू फॉर्ममध्ये नाहीत. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही अजूनही फॉर्मशी झुंजत आहेत. दोघांनी पाच सामने खेळले असून अद्याप एकही अर्धशतक झळकावलेले नाही. चाहते फलंदाजांकडून मोठ्या फटकेबाजीची वाट पाहत आहेत, पण आतापर्यंत विराट आणि रोहितची बॅट तळपलेली नाही.

विश्वचषकापूर्वीच ही चिंतेची बाब आहे, कारण हा वेगवान खेळ आहे आणि तरुण प्रतिभा ज्या प्रकारे कामगिरी करत आहे. अशा परिस्थितीत बड्या नावांवरील प्रतिभेकडे दुर्लक्ष करणे निवडकर्त्यांसाठी आव्हानात्मक असेल.

तसेच, रवींद्र जडेजा सीएसके संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. त्याला अद्याप तरी त्याची अष्टपैलू खेळी खेळता आलेली नाही. येत्या काही महिन्यांत हार्दिक पांड्याची अष्टपैलू खेळाडू म्हणून पुनरागमन करण्याबाबतही चर्चा होणार आहे. पण एक फलंदाज म्हणून, शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात, त्याने 52 चेंडूत 87 धावा करत काही चमकदार क्रिकेटिंग शॉट्स लगावले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) साठी फिनिशर म्हणून दिनेश कार्तिकची भूमिका पाहता 36 वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाज भारतीय संघात सामील होऊ शकतो. कारण या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ICC T20 विश्वचषकासाठी संघा पुन्हा तयार करायचा आहे. आयपीएल 2022 मध्ये, कार्तिकने 218.33 च्या स्ट्राइक रेटने 131 धावा केल्या आहेत.

तसेच पंजाब किंग्जकडून खेळणारा शिखर धवन (36) देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये त्याने 197 धावा केल्या आहेत. गेल्या वर्षी डावखुऱ्या फलंदाजाकडे दुर्लक्ष झाले होते, मात्र यावेळी त्याला संघात स्थान मिळवण्याची संधी आहे. 36 वर्षीय रॉबिन उथप्पा (चेन्नई सुपर किंग्ज) हा देखील प्रबळ दावेदार आहे कारण त्याने आतापर्यंत पाच सामन्यांमध्ये 194 धावा केल्या आहेत आणि तो चांगला फॉर्ममध्ये दिसत आहे. मात्र, 2022 च्या आयपीएलमध्ये अजूनही अनेक सामने बाकी असून लीग संपल्यानंतर खेळाडूंच्या कामगिरीवर चर्चा होईल, असे मानले जात आहे.

हेही वाचा -Road Safety World Series : तब्बल 28 वर्षांनंतर 'या' शहरात सचिन तेंडुलकरची फलंदाजी पाहायला मिळणार

ABOUT THE AUTHOR

...view details