महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Umpire Killed : धक्कादायक! चुकीच्या निर्णय देणाऱ्या अंपायरची खेळाडूने काढली कायमचीच विकेट... - Cricket Tournament

रविवारी कटकच्या चौद्वारमध्ये एका क्षुल्लक कारणावरून क्रिकेट सामन्याला अम्पायर म्हणून काम करणाऱ्या तरुणाची हत्या करण्यात आली. लकी राऊत (२२) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा तरूण कटक जिल्ह्यातील महिशीलंदा गावातील रहिवासी होता. घटनेनंतर आरोपीला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर स्थानिक परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Umpire Killed
क्रिकेट स्पर्धेदरम्यान चुकीच्या निर्णयामुळे अंपायरची हत्या

By

Published : Apr 3, 2023, 10:08 AM IST

कटक (ओडिशा) : ओडिशामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चौद्वार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या महिसलंदा गावात रविवारी क्रिकेट स्पर्धा सुरू होती. बेरहामपूर आणि शंकरपूर या दोन स्थानिक गावांचे संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळत होते. चुकीच्या निर्णयामुळे खेळादरम्यान त्याच गावातील स्मृती रंजन राउत नावाच्या तरुणाला अम्पायरच्या निर्णयाचा राग आला आणि त्याने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. स्मृतीने त्याच्यावर बॅटने हल्ला करून चाकूने वार केले. गंभीर जखमी लकी राऊतला एससीबी मेडिकलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आरोपीला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले :रविवारी कटकच्या चौद्वारमध्ये एका क्षुल्लक कारणावरून क्रिकेट सामन्यात तरुणाची हत्या करण्यात आली. लकी राऊत (२२) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा तरूण कटक जिल्ह्यातील महिशीलंदा गावातील रहिवासी होता. घटनेनंतर आरोपीला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर स्थानिक परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुढील तपास सुरू केला आहे :या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आणि अम्पायरपैकी एक असलेले पृथ्वीरंजन सामल म्हणाले, सामनादरम्यान, पहिला चेंडू खेळणारा ब्रह्मपूरचा फलंदाज बाद झाला. त्यानंतर ब्रह्मपूर गावातील जग्गा राऊत याचा त्याच्याशी वाद झाला. त्यानंतर मुख्य आरोपी स्मृतीरंजन राऊत घटनास्थळी दाखल झाला. कोणाला काही कळायच्या आधीच ते खेळाच्या मैदानात शिरले. जग्गा आणि स्मृती मागून आले आणि त्यांनी लकीचा हात धरला. त्यानंतर स्मृतीरंजनला भोसकले. मात्र, हल्लेखोरांपैकी एक गावकऱ्यांच्या हाती लागला, असे पृथ्वीरंजन यांनी सांगितले. घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. आता पुढील तपास सुरू केला आहे. अशाप्रकारे हा धक्कादायक प्रकार कटकमध्ये घडला आहे. या घटनेमुळे गावामध्ये अशांतता पसरली आहे. तसेच भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे..

हेही वाचा :Mumbai Crime News: गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याकडून चोरले 1 कोटी 18 लाखांचे हिरे; दोघांना मुंबईतून ठोकल्या बेड्या

ABOUT THE AUTHOR

...view details