नवी दिल्ली :कसोटी क्रिकेटला 146 वर्षे पूर्ण झाली आहेत. 15 मार्च 1877 रोजी मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 45 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या चार्ल्स बॅनरमनने कसोटी क्रिकेटच्या पहिल्या चेंडूचा सामना केला. बॅनरमनने पहिले कसोटी शतक झळकावले होते. त्याने 165 धावांची खेळी खेळली. इंग्लंडच्या अॅलन हिलने पहिली विकेट घेतली.
12 देश कसोटी क्रिकेट खेळतात : सध्या जगातील 12 देश कसोटी क्रिकेट खेळतात. भारताने 569 कसोटी सामने खेळले आहेत. टीम इंडियाने 172 सामने जिंकले तर 175 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. 221 कसोटी अनिर्णित राहिल्या तर एक सामना बरोबरीत राहिला. भारताने कांगारूंना सर्वाधिक 32 वेळा पराभूत केले आहे. त्याचबरोबर टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या 50 टेस्टमध्ये सर्वाधिक पराभवाला सामोरे जावे लागले. भारताची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या 759 धावा आहे, जी इंग्लंडविरुद्ध केली होती. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 36 धावांची सर्वात छोटी धावसंख्या केली. कसोटी क्रिकेटला 146 वर्षे पूर्ण झाली आहेत. 15 मार्च 1877 रोजी मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 45 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या चार्ल्स बॅनरमनने कसोटी क्रिकेटच्या पहिल्या चेंडूचा सामना केला. बॅनरमनने पहिले कसोटी शतक झळकावले होते. त्याने 165 धावांची खेळी खेळली.
सर्वात कमी चेंडूंवर बाद होण्याचा विक्रम : सर्वात कमी चेंडूंवर बाद होण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. 1924 मध्ये इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ 12.3 षटकांत 30 धावांवर गारद झाला होता. इंग्लंडमधील लॉर्ड्सच्या मैदानावर सर्वाधिक सामने खेळले गेले आहेत. लॉर्ड्सवर आतापर्यंत 143 कसोटी सामने खेळले गेले आहेत.
सचिनच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक 51 शतके ठोकण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरनेही कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले आहे. त्याचबरोबर सर्वाधिक द्विशतकांचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या डोनाल्ड ब्रॅडमनच्या नावावर आहे. ब्रॅडमन यांनीच 2 तिहेरी शतके झळकावण्याचा इतिहास रचला.