दुबई -टी-20 विश्वचषकाच्या 16 व्या सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान संघामध्ये महामुकाबला झाला. यात भारताने दिलेले धावसंख्येचे लक्ष्य पाकिस्तानच्या संघाने सहज पार केले आणि ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने कर्णधार कोहलीच्या 57 व रिषभ पंतच्या 39 धावांच्या बळावर 20 षटकांत 151 धावा धावफलकावर लावल्या होत्या. हे आव्हान पाकिस्तानच्या संघाने सहजरित्या पूर्ण केले. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या संघाने एकही बळी न गमावता भारताने दिलेले आव्हान 17.5 षटकांत पूर्ण केले. पाकिस्तानकडून खेळताना मोहम्मद रिझवानच्या नाबाद 79 तर कर्णधार बाबर आझमने 68 धावा केल्या.
दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्डेडिअमवर दोन्ही संघ एकमेकांशी भिडले. टी-20 विश्वचषकातील 16 व्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 151 धावा केल्या. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारतला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारताने कर्णधार कोहलीच्या 57 व रिषभ पंतच्या 39 धावांच्या बळावर 20 षटकांत 151 धावा धावफलकावर लावल्या. रविद्र जडेजाने 13 चेंडूत 13 धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने 11 धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकांत भुवनेश्वर कुमारने 5 धावा काढून संघाची धावसंख्या दीडशेच्यावर पोहोचवली.