अबुधाबी - मुंबई इंडियन्सचा संघाचा कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज सूर्यकुमार यादव हे तिघे चार्टर प्लेनने अबुधाबी येथे पोहोचले आहेत. याची माहिती मुंबई इंडियन्सने दिली.
रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव हे तिघे 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएल 2021 च्या उर्वरित हंगामात भाग घेणार आहेत. हे खेळाडू इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला गेले होते. तेथून ते अबुधाबीला पोहोचले आहेत.
मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायझीने याविषयी सांगितलं की, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव हे तिघे एका खासगी चार्टर प्लेनने अबुधाबीला पोहोचले आहे. त्या तिघांसोबत त्यांचा परिवार देखील होता. आज सकाळी ते अबुधाबीत दाखल झाले. पुढील सहा दिवस ते क्वारंटाईनमध्ये राहतील.