जोहान्सबर्ग -भारताचा पहिला डाव 202 धावामध्ये संपला आहे. कर्णधार केएल राहुलने केलेल्या 50 धावा व रविचंद्रन अश्विनच्या 46 धावांच्या खेळीमुळे भारत दोनशे धावांचा टप्पा ओलांडू शकला. कागिसो रबाडा आणि डुआन ऑलिव्हियर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर मार्को जॅन्सनने चार गडी बाद करुन आपले वर्चस्व सिध्द केले. दक्षिण आफ्रिका संघाच्या पहिल्या डावाला सुरुवात झाली आहे.
भारताचा पहिला डाव 202 धावात आटोपल्याने दक्षिण आफ्रिका संघाला या सामना जिंकून 1-1 असी बरोबरी करण्याची संधी आहे.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव, पहिल्या दिवस अखेरीस 1 बाद 35 धावा
आफ्रिकेचे सलामीवीर डीन एल्गर आणि एडन मार्कराम यांनी डावाला सुरुवात केली. परंतु संघाच्या 14 धावा फलकावर असतानाच एडन मार्करामला मोहम्मद शामीने पायचित केले. तो केवळ 7 धावा काढून तंबूत परतला आहे.
सलामीवीर डीन एल्गरच्या साथीला आता कीगन पीटरसन उतरला. पहिल्या दिवसाच्या अखेरीस द. आफ्रिका संघाने पहिल्या डावात 18 षटकांचा सामना करीत 1 बाद 35 धावा केल्या आहेत. डीन एल्गर 11 धावावर खेळत असून कीगन पीटरसनने 14 धावा केल्या आहेत.