हैदराबाद: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल यांचा बचाव केला ( Rohit Sharma Defends Bhuvneshwar and Harshal ) आहे. रोहितने टी20 विश्वचषकापूर्वी दोन्ही गोलंदाज फॉर्ममध्ये परतण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. आशिया कपमधील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाने तीन सामन्यांच्या T20I मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला ( India won the T20 series against Australia ). भुवनेश्वर आणि हर्षल मात्र खूप महागडे ठरले. या दोघांनी प्रत्येकी 12 पेक्षा जास्त सरासरीने धावा दिल्या.
कर्णधार रोहित शर्मा ( Captain Rohit Sharma ) म्हणाला, भुवीला वेळ देण्याची गरज आहे. कारण संघात त्याच्यासारखा खेळाडू असल्यामुळे तो काय करू शकतो याची कल्पना येते. त्याचा खराब फॉर्म फार काळ टिकणार नाही. "आम्ही काही योजनांवर काम करत आहोत आणि आशा आहे की आम्ही त्याला डेथ ओव्हर्समध्ये अधिक गोलंदाजी पर्याय देऊ शकतो," असे कर्णधार म्हणाला. यामुळे तो पूर्वीप्रमाणे कामगिरी करू शकेल.
भुवनेश्वरमध्ये आत्मविश्वासाची कमतरता नाही -
रोहित शर्मा पुढे म्हणाला की, भुवनेश्वरमध्ये ( Fast bowler Bhuvneshwar Kumar ) आत्मविश्वासाची कमतरता नाही. "मला वाटत नाही की त्याच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे. आपण त्याच्यावर आणि त्याच्या कौशल्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. रोहित म्हणाला, आम्ही आमच्या बाजूने काय करता येईल हे पाहत आहोत. कारण डेथ ओव्हर्समध्ये काहीही होऊ शकते. अशा स्थितीत गोलंदाजीचे पर्याय असणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यानुसार क्षेत्र निश्चित करता येईल. त्यानुसार जुळवून घेण्यासाठी अनुभवाची गरज असते.
दुखापतीतून पुनरागमन करणे सोपे नाही -