हैदराबाद ICC World Cup 2023 : भारतानं नेहमीच मोठ्या अपेक्षांसह विश्वचषकात प्रवेश केलाय. कारण भारताचं क्रिकेटबद्दल प्रेम सर्वांना परिचित आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं ICC स्पर्धांमध्ये भारताला विश्वविजेतेपदापर्यंत नेत अभूतपूर्व यश मिळवून दिलं होतं. तथापि, 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारत आयसीसी ट्रॉफीमध्ये विजय मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. भारत सातत्यानं प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवतो मात्र, महत्त्वाच्या प्रसंगी भारताला पराभूत व्हावं लागतंय.
भारताकडं विश्वचषक जिंकण्याची संधी :यावेळी भारताकडं विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी आहे. भारतातच विश्वकप सामने होत असल्यानं त्याचा फायदा भारतीय गोलंदाजाना होऊ शकतो. भारताकडं मजबूत गोलंदाजासह, दर्जेदार फलंदाजांचा संघ आहे. त्यामुळं भारतीय संघाला मायभूमीवर यश मिळवणं सहज शक्य आहे. मात्र भारतासमोर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान सारख्या संघाचं अव्हान आहे. त्यामुळं विश्वकप जिकंण्याची लढाई म्हणावी तेवढी सोपी दिसत नाही. तरी देखील भारतीस संघाचा विश्वास पाहता संघ विश्वकपला गवासणी घालेले असं क्रिकेट प्रेमींना वाटतंय.
भारताची फलंदाजी मजबूत :जबरदस्त फॉर्मच्या जोरावर भारत विश्वकप स्पर्धेत उतरत आहे. भारतानं आगोदरच आशिया कप 2023 जिंकलाय. भारतानं एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-1 नं पराभूत करत अशिया कपवर नाव कोरलंय. भारताची फलंदाजी संघाची सर्वात मोठी ताकद असणार आहे. कारण खेळपट्ट्या फलंदाजांना धावा करण्यास मदत करतील. कर्णधार रोहित शर्मानं खेळलेल्या शेवटच्या चार एकदिवसीय सामन्यात तीन अर्धशतकं झळकावली आहेत. त्याच्यासोबतच दिग्गज फलंदाज विराट कोहलीनं उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे, तर युवा खेळाडू शुभमन गिलनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ताज्या मालिकेत 50+ धावा करत आशिया चषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू झाला. केएल राहुल, श्रेयस अय्यर यांनी देखील चांगली खेळी केली. यावरुन भारताची फलंदाजी मजबूत असल्याचं दिसतंय.
भारतीय गोलंदाजीचा कहर : कुलदीप यादवनं विकेट घेण्याचा पराक्रम सुरू ठेवलाय, तसंच रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा या फिरकीपटूंची देखील संघाला मदत होणार आहे. मोहम्मद सिराजनं आशिया कप फायनलमध्ये कहर केलाय, तर मोहम्मद शमीनं ऑस्ट्रेलिया सामन्यात पाच विकेट घेतल्या होत्या. यावरुनच भारतीय संघ विश्वचषकाचा पक्का दावेदार मानला जातोय, मात्र संघातील काही चुका दुरूस्त करण्याची गरज आहे. अन्याथा विश्वचषकाला भारताला मुकावं लागू शकतं.
भारतीय संघाची कमजोरी :भारतीय संघातील बहुतेक फलंदाज उजव्या हाताचे आहेत. त्यामुळं भारतीय संघाकडं डावखुरा फलंदाजीचा पर्याय नसल्यामुळं इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळलं जाण्याची शक्यता आहे. इशानला बेंचिंग केल्यास, मेन इन ब्लू लेग-स्पिनर्सचा पर्याय भारत गमावू शकतो. तसेच केएल राहुल अर्धवेळ यष्टीरक्षक असल्यानं, फलंदाजांना बाद करण्याच्या शक्यतांवर परिणाम होऊ शकतो. तसंच, अष्टपैलू खेळाडूऐवजी शार्दुल ठाकूरला खालच्या क्रमानं खेळवूनल भारताचा विकेट वाचवण्यावर भर आहे. शार्दुलचा 44 एकदिवसीय सामन्यांत 6.24 चा इकॉनॉमी रेट आहे, जो फारसा चांगला रेट नाही. अशा परिस्थितीत मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज किंवा रविचंद्रन अश्विनसारख्या दर्जेदार गोलंदाजांना बाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे.