महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; दोन यष्टीरक्षकांचा समावेश

12 मार्च रोजी अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडियमवर पहिला टी-२० सामना खेळवला जाणार आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचेही भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

By

Published : Feb 20, 2021, 9:51 PM IST

T20I series announce
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

मुंबई- इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाची घोषणा केली आहे. इशान किशनला अतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.

12 मार्च रोजी अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडियमवर पहिला टी-२० सामना खेळवला जाणार आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचेही भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. जादुई फिरकीपटू वरुण चक्रवर्तीचा संघात समावेश करण्यात आला आहे. मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू राहुल तेवतिया यांनाही संघात स्थान मिळाले आहे.

भारतीय संघ असा -

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

ABOUT THE AUTHOR

...view details