महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs AUS : दिनेश कार्तिकची बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये एंट्री; कसोटी मालिकेत समालोचन करणार - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना

दिनेश कार्तिक बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधून सेटवर पुनरागमन करणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत समालोचनातून परतण्यासाठी दिनेश सज्ज झाला आहे.

IND vs AUS
दिनेश कार्तिकची बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये एंट्री

By

Published : Feb 4, 2023, 4:43 PM IST

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 9 फेब्रुवारीपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये हा सामना होणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या मालिकेतून भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सेटवर परतणार आहे. या सामन्यात दिनेश कार्तिक कॉमेंट्री करताना दिसणार आहे. या सामन्यादरम्यान दिनेश कार्तिक इतर समालोचकांसोबत कॉमेंट्री बॉक्सचा भाग असेल. आतापर्यंत याविषयी फक्त चर्चा होत होती, मात्र आता या मालिकेत दिनेश कॉमेंट्री करताना दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कॉमेंट्री करण्यासाठी खूप उत्सुक :दिनेश कार्तिकने त्याच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, तो भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत कॉमेंट्री करण्यासाठी खूप उत्सुक आहे. दिनेश कार्तिक समालोचन संघाचा भाग होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही दिनेश सामन्यात कॉमेंट्री करताना दिसला आहे. विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकचे टीम इंडियात पुनरागमन झाल्यामुळे तो कॉमेंट्रीऐवजी मैदानावर दिसायला लागला, असे म्हटले जाते. पण आता दिनेश पुन्हा कॉमेंट्री करताना दिसणार आहे. दिनेश शेवटचा टी-२० वर्ल्ड कप दरम्यान टीम इंडियाच्या टी-शर्टमध्ये दिसला होता. त्यानंतर दिनेश भारतीय संघातून बाहेर पडत आहे.

टीम इंडियात पुनरागमन : दिनेश कार्तिक भारताच्या संघात आणि संघाबाहेर असला तरी दिनेश आयपीएलमध्ये सतत खेळत आहे. सध्या दिनेश कार्तिक आयपीएलमधील विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा एक भाग आहे. अलीकडेच, विराटच्या आरसीबीला जगभरातील लोकप्रियतेच्या बाबतीत इंस्टाग्राम स्पोर्ट्स खात्यात पाचव्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंनी सराव सुरू केला आहे. या मालिकेत कर्णधार रोहित शर्माने अनुभवी खेळाडूंसह इतर खेळाडूंना संधी दिली आहे. त्याचबरोबर या कसोटी मालिकेतून अष्टपैलू रवींद्र जडेजा टीम इंडियात पुनरागमन करेल, असा अंदाज बांधला जात आहे. तो बराच काळ दुखापतीमुळे संघाबाहेर होता.

जडेजा ५ महिने क्रिकेटपासून दूर : रवींद्र जडेजाने ऑगस्ट २०२२ मध्ये शेवटचा सामना खेळला होता. दुबईत झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताचा हाँगकाँगविरुद्ध सामना झाला होता. या सामन्यादरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे तो ५ महिने क्रिकेटपासून दूर होता. दुखापतीमुळे जडेजा ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकात सहभागी होऊ शकला नाही.

हेही वाचा :Dipa karmakar : भारताची जिम्नॅस्ट दीपा करमारकर अडचणीत; डोपिंग प्रकरणात आयटीएची मोठी कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details