महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 11, 2020, 11:51 PM IST

ETV Bharat / sports

कोरोनाच्या धोक्यामुळे 'ही' मोठी टी-२० मालिका पुढे ढकलली

कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने, मायदेशात होणारी आशिया एकादश आणि विश्व एकादश यांच्यातील टी-२० मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

World XI v Asia XI matches postponed amid coronavirus fears
कोरोनाच्या धोक्यामुळे 'ही' मोठी टी-२० मालिका पुढे ढकलली

ढाका- कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मायदेशात होणारी आशिया एकादश आणि विश्व एकादश यांच्यातील टी-२० मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. उभय संघात २ सामन्याची मालिका २१ आणि २२ मार्चला खेळवण्यात येणार होती. परंतु, कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रभावामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दोनही सामने पुढे ढकलले आहेत. दरम्यान, या मालिकेचे आयोजन बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीब-उर-रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्त करण्यात येणार आहे.

बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी याविषयी सांगितले की, 'कोरोनाच्या धोक्यामुळे मालिकेत खेळाडू सहभागी होतील की नाही, याची आम्हाला खात्री नाही. तसेच अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे आयोजनाबाबत आम्ही एक महिन्यांनी परिस्थिती विचार करु. पण सद्या ही मालिका स्थिगित करण्यात आली आहे.'

बांगलादेशच्या बोर्डाने ढाका प्रीमियर लीगच्या वेळापत्रकातही बदल केल्याचे समजते. आशिया एकादश संघात विराट कोहलीसह कुलदीप यादव, मोहम्मद शमी, शिखर धवन, ऋषभ पंत आणि केएल राहुल या सहा खेळाडूंचा समावेश आहे.

दरम्यान, चीनपासून सुरुवात झालेल्या कोरोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक घट्ट होताना दिसून येत आहे. आजघडीपर्यंत या व्हायरसने जगभरात ४ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक देशांमध्ये या व्हायरसचा फैलाव झाला आहे. भारतामध्येही ६० हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.

हेही वाचा -मराठमोळ्या स्मृतीने विश्वकरंडकातील पराभवासाठी मागितली माफी, म्हणाली...

हेही वाचा -IND VS SA : कोरोनाच्या धास्तीने भारतीय खेळाडू म्हणतो... 'ही' गोष्ट टाळणार

ABOUT THE AUTHOR

...view details