महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बांगलादेशी खेळाडूंना दिल्लीच्या प्रदूषणाचा फटका, तब्येत बिघडली - दिल्लीच्या प्रदूषणामुळे बांगलादेशी खेळाडूंना उलट्यांचा त्रास

एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीच्या सामन्यानंतर बांगलादेशी खेळाडू सौम्या सरकार आणि आणखी एक खेळाडूला उलट्यांचा त्रास होत आहे.

बांगलादेशी खेळाडूंना दिल्लीच्या प्रदुषणाचा फटका, तब्येत बिघडली

By

Published : Nov 6, 2019, 1:13 PM IST

नवी दिल्ली - भारत-बांगलादेश संघामध्ये नियोजित पहिला टी-२० सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात पार पडला. बांगलादेशने या सामन्यात भारतावर मात करत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र, दिल्लीचा सामना गाजला प्रदूषणाच्या चर्चेने. पण अखेर हा सामना नियोजित कार्यक्रमानूसार खेळला गेला. आता प्रदूषणामुळे बांगलादेशी खेळाडूंना त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे.

एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीच्या सामन्यानंतर बांगलादेशी खेळाडू सौम्या सरकार आणि आणखी एक खेळाडूला उलट्यांचा त्रास होत आहे.

दिल्लीच्या वाढलेल्या प्रदूषणामुळे सामना इतरस्थ हलवावा, अशी मागणी काही माजी खेळाडूंसह पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली होती. मात्र, बीसीसीआयने सामना दिल्लीतच होणार असे स्पष्ट केले. त्यानंतर सामना देखील पार पडला. मात्र, आता बांगलादेशी खेळाडू प्रदूषणाने आजारी पडल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, बांगलादेशी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमुल हसन यांनीही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. भारत-बांगलादेश संघामध्ये दुसरा सामना ७ तारखेला राजकोटच्या मैदानावर रंगणार आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे.

हेही वाचा ःबांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्याआधी चाहत्यांसाठी वाईट बातमी!

हेही वाचा ः#HBD Virat: वाढदिवशी विराटने लिहिले स्वतःलाच प्रेरणादायी पत्र, वाचून तुमच्यातही संचारेल ऊर्जा

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details