महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कोण आहे विश्वचषक विजयाचा प्रबळ दावेदार ? सौरव गांगुलीचे उत्तर

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही यावर मत मांडताना भारत जगातील सर्वात मजबूत संघ असून विजयाचा प्रबळ दावेदार आहे, असे म्हटले आहे.

By

Published : Feb 23, 2019, 8:35 AM IST

सौरव गांगुली १

मुंबई- इंग्लंड येथे यावर्षी क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी अनेकांनी इंग्लंड आणि भारत या संघांना विजयाचे प्रबळ दावेदार मानले आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही यावर मत मांडताना भारत जगातील सर्वात मजबूत संघ असून विजयाचा प्रबळ दावेदार आहे, असे म्हटले आहे.


भारतीय संघ विश्वकरंडक जिंकू शकतो. गेल्या ६-७ महिन्यापासून भारतीय संघाने चांगले प्रदर्शन केले आहे. भारतीय संघ विश्वकरंडकासाठी पूर्णपणे तयार आहे. प्रत्येकजण चांगली कामगिरी करत आहे. सध्याचा भारतीय संघ सर्वश्रेष्ठ आहे, असे गांगुली म्हणाला.


गेल्यावर्षी भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांत चांगले प्रदर्शन करताना दक्षिण आफ्रिकेला त्याच्यांच मायभूमीत ५-१ असे हरवले होते. परंतु, इंग्लंड येथे झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताला २-१ अशा पराभवाला सामोरे जाव लागले होते. गेल्यावर्षी झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताचा तो एकमेव पराभव होता.


भारताने विंडीजविरुद्धही घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करत मालिका जिंकली होती. त्यानंर, ऑस्ट्रेलिया येथे २-१ आणि न्यूझीलंड येथे ४-१ ने मालिका जिंकत भारताने विश्वकरंडकासाठी तयार असल्याचे दाखवून दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details