महाराष्ट्र

maharashtra

रणजीचा आजपासून रंगणार थरार, 'या' नवीन संघाकडे सर्वांचे लक्ष!

By

Published : Dec 9, 2019, 10:14 AM IST

तब्बल ४१ वेळा जेतेपद पटकावलेल्या मुंबई आणि यंदा या स्पर्धेच्या जेतेपदाच्या हॅट्ट्रिकचे स्वप्न पाहणाऱ्या विदर्भ संघांकडे सर्वांचे लक्ष असले तरी चंडीगड या नव्या संघाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

ranji trophy 2019-20 begins today
रणजीचा आजपासून रंगणार थरार, 'या' नवीन संघाकडे सर्वांचे लक्ष!

मुंबई - स्थानिक क्रिकेटमध्ये खेळाडूंचा कस पाहणारी आणि वरिष्ठ संघात निवड होण्यासाठी महत्वाची मानली जाणारी यंदाची रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरु होत आहे. ३८ संघांमध्ये ही स्पर्धा ९ डिसेंबर ते पुढील वर्षाच्या १३ मार्चपर्यंत चालणार आहे.

हेही वाचा -पाक खेळाडूने ओढले स्वतःच्याच मंडळावर ताशेरे, म्हणाला, 'थट्टा बस करा!'

तब्बल ४१ वेळा जेतेपद पटकावलेल्या मुंबई आणि यंदा या स्पर्धेच्या जेतेपदाच्या हॅट्ट्रिकचे स्वप्न पाहणाऱ्या विदर्भ संघांकडे सर्वांचे लक्ष असले तरी चंडीगड या नव्या संघाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याव्यतिरिक्त विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचे जेतेपद पटकावलेल्या कर्नाटकचा संघही बलाढ्य मानला जात आहे. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि युवा खेळाडू पृथ्वी शॉ याच्या सहभागामुळे मुंबईचा संघ अधिक बळकट झाला आहे.

स्पर्धेतील संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. 'अ' आणि 'ब' या गटांमध्ये एकत्रितपणे सर्वाधिक गुण मिळवणारे पाच संघ उपांत्यपूर्व फेरीत पात्र ठरतील. तर, 'क' गटातून दोन आणि 'प्ले' गटातून एक संघ उपांत्यपूर्व फेरी गाठू शकेल.

आज होणारे सामने -

  • मुंबई वि. बडोदा
  • महाराष्ट्र वि. हरयाणा
  • विदर्भ वि. आंध्र प्रदेश
  • रेल्वे वि. उत्तर प्रदेश

स्पर्धेची गटवारी -

  • 'अ' गट - आंध्र प्रदेश, बंगाल, दिल्ली, गुजरात, हैदराबाद, केरळ, पंजाब, राजस्थान, विदर्भ.
  • 'ब' गट - बडोदा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, मुंबई, रेल्वे, सौराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश.
  • 'क' गट - आसाम, छत्तीसगड, हरयाणा, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, सेनादल, त्रिपुरा, उत्तराखंड,
  • 'प्ले' गट - अरूणाचल प्रदेश, बिहार, चंडीगड, गोवा, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पुडुच्चेरी, सिक्कीम.

ABOUT THE AUTHOR

...view details