मुंबई - बांगलादेश विरुध्दच्या कसोटी मालिकेनंतर वेस्ट इंडीजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारत-वेस्ट इंडीज संघात ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. बीसीसीआयने या दौऱ्यातील टी-२० मालिकेत महत्वपूर्ण बदल केले आहेत.
भारत-वेस्ट इंडीज संघामध्ये टी-२० मालिकेतील पहिला सामना ६ डिसेंबरला नियोजित कार्यक्रमानुसार मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगणार होता. मात्र या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने लाखो अनुयायी मुंबईत येत असतात.
तसेच ६ डिसेंबरला बाबरी मशीद पाडण्यात आली होती. नुकताच या प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे शहरात कोणतेही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. या दोन्ही कारणाने ६ डिसेंबरच्या सामन्याला पोलीस बंदोबस्त पुरवण्यात मुंबई पोलिसांनी असमर्थता दर्शवली.