महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 8, 2019, 12:11 PM IST

ETV Bharat / sports

अटक वॉरंटनंतर 'या' दिवशी भारतात येणार मोहम्मद शमी

येत्या १२ सप्टेंबरला शमी भारतात येणार आहे. विंडीज मालिकेनंतर, शमी भारतात न येता अमेरिकेला रवाना झाला होता. त्यामुळे तो कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.  त्याची पत्नी हसीन जहानने त्याच्याविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता आणि याबाबत कोलकाताच्या अलिपूर कोर्टाने त्याला १५ दिवसात शरण जाण्याचे आदेश दिले होते.

अटक वॉरंटनंतर 'या' दिवशी भारतात येणार मोहम्मद शमी

नवी दिल्ली -भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीविरोधात पत्नी हसीन जहानने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर, 2 सप्टेंबरला शमीविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले. पण, वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेत शमी व्यस्त असल्याने त्याला भारतात येणे शक्य झाले नाही. मात्र, आता त्याच्या परतीची तारीख ठरली आहे.

हेही वाचा -सचिन नव्हे, विराट नव्हे, तर एका महिलेने केलाय हा 'भीमपराक्रम'

येत्या १२ सप्टेंबरला शमी भारतात येणार आहे. विंडीज मालिकेनंतर, शमी भारतात न येता अमेरिकेला रवाना झाला होता. त्यामुळे तो कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याची पत्नी हसीन जहानने त्याच्याविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता आणि याबाबत कोलकाताच्या अलिपूर कोर्टाने त्याला १५ दिवसात शरण जाण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा -'हौसले जिंदा है', 'चांद्रयान - २' च्या मोहिमेवर खेळाडूंनी दिल्या प्रतिक्रिया...

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की शमी १२ सप्टेंबरला भारतात परतनार असून तो त्याचा वकील सलीम रहमान यांच्याशी संपर्कात आहे. हसीन जहानने शमी आणि त्याच्या भावावर घरगुती हिंसाचारबद्दल आय.पी.सी च्या कलम ४९८ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हसीन जहान म्हणाली होती, 'मला ममता बॅनर्जींनी वाचवले. मी न्यायालयीन यंत्रणेची आभारी आहे. वर्षभरापासून मी न्यायासाठी झगडत आहे. जर शमी एक मोठा क्रिकेटपटू आणि खूप शक्तिशाली आहे असा विचार तो करत असेल तर तसे नाही. जर मी पश्चिम बंगालची नसते, ममता बॅनर्जी आमच्या मुख्यमंत्री नसत्या तर मी इथे सुखाने राहिले नसते. अमरोहा (उत्तर प्रदेश) पोलिसांनी मला आणि माझ्या मुलीला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला, ते यशस्वी झाले नाहीत.'

ABOUT THE AUTHOR

...view details