किंग्स्टन -टीम इंडियाच्या विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन विक्रम पाहायला मिळाले. एकीकडे शतकवीर हनुमा विहारीने मास्टर ब्लास्टर सचिनच्या एका विक्रमाची बरोबरी केली. तर, दुसरीकडे वेगवान गोलंदाज इशांत शर्माने भारताचा माजी कर्णधार कपिल देवचा खास विक्रम मोडित काढला.
हेही वाचा -राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशीप : महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेने मोडला स्वत:चाच विक्रम
इशांत आता कसोटी क्रिकेटमध्ये आशिया खंडाबाहेर सर्वाधिक बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी कपिल देव यांच्या नावावर ४५ कसोटी सामन्यात १५५ विकेट्स जमा आहेत. तर, इशांतने विंडीजविरुद्धच्या सामन्यात क्रेग ब्रेथवेटला माघारी धाडत आपला १५६ वा बळी घेतला. त्याने ही कामगिरी ४६ कसोटींत केली आहे.