चेन्नई - आयपीएल २०२१ चा पाचवा सामना आज गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाणार आहे. मुंबईचा संघ गुणतालिकेत विजयाचे खाते उघडण्याच्या शोधात आहे. तर दुसरीकडे कोलकाताची नजर दुसऱ्या विजयासह गुणतालिकेत अव्वलस्थान काबिज करण्यावर आहे. परंतु त्यांच्यासाठी हे काम म्हणावे तसे सोप्प नाही. कारण आकडेवारी पाहिल्यास मुंबईचा संघ वरचढ असल्याची बाब स्पष्ट होते.
हेड टू हेड आकडेवारी -
मुंबई आणि कोलकाता हे संघ आतापर्यंत २७ वेळा समोरासमोर आले आहेत. यात तब्बल २१ सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे. तर राहिलेल्या फक्त ६ सामन्यात कोलकाता विजयी ठरली आहे. या दोन्ही संघात झालेल्या गेल्या १२ सामन्यात कोलकाताला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला. मागील वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएल हंगामामध्ये मुंबईने साखळी फेरीत कोलकाताविरुद्धच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला होता. यामुळे आजच्या सामन्यात देखील मुंबईचे पारडे जड असणार आहे. परंतु, कोलकाताने पहिल्या सामन्यात बलाढ्य सनरायजर्स हैदराबादचा पराभव केल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ -