दुबई - भारतीय संघाने चेन्नई येथील दुसरा कसोटी सामना ३१७ धावांनी जिंकत चार सामन्याच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. भारतीय संघाच्या या विजयामुळे आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत बदल पाहायला मिळाले. भारतीय संघाने यात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाची चौथ्या स्थानावर घसरण झाली होती. पण दुसऱ्या कसोटीत पराभवाची परतफेड करत भारतीय संघाने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. दुसरीकडे पराभवाचा फटका इंग्लंड संघाला बसला आहे. इंग्लंडचा संघ पहिल्या स्थानावरुन थेट चौथ्या क्रमांकावर घसरला आहे.