महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Ind Vs Aus Final : पावसाने अंतिम सामना रद्द झाल्यास कोणता संघ विजेता ठरणार, जाणून घ्या - महिला क्रिकेट

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रविवारी सकाळी मेलबर्नमध्ये काही काळ पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पूर्ण दिवस ऊन असेल. त्यामुळे अंतिम सामना होऊ शकतो. पण सायंकाळीही जर पावसाने हजेरी लावली आणि पावसामुळे सामना न झाल्यास हा सामना सोमवारी राखीव दिवशी होईल.

icc t20 woman world cup final india vs australia melbourne weather report
Ind Vs Aus Final : पावसाने अंतिम सामना रद्द झाल्यास कोणता संघ विजेता ठरणार, जाणून घ्या

By

Published : Mar 7, 2020, 5:57 PM IST

मेलबर्न- आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट स्टेडियममध्ये (एमसीजी) उद्या (रविवार) खेळला जाणार आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट आहे. अंतिम सामन्यात पावसाने खोडा घातल्यास कोणता संघ विजेता ठरणार? हा प्रश्न चाहत्यांना सतावत असेल.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रविवारी सकाळी मेलबर्नमध्ये काही काळ पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पूर्ण दिवस ऊन असेल. त्यामुळे अंतिम सामना होऊ शकतो. पण सायंकाळीही जर पावसाने हजेरी लावली आणि पावसामुळे सामना न झाल्यास हा सामना सोमवारी (९ मार्च ) राखीव दिवशी होईल.

पण जर ९ मार्चलाही पावसामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे सामना झाला नाही तर आयसीसीच्या नियमानुसार दोन्ही संघाना संयुक्तपणे विजेतेपद देण्यात येणार आहे.

दरम्यान, उपांत्य सामन्यांमध्ये अशी कोणतीही व्यवस्था नव्हती. भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामन्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. यात गुणांच्या आधारे भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसर्‍या उपांत्य सामन्यालादेखील पावसाने फटका बसला. पण हा सामना ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमाने ५ धावांनी जिंकला आणि पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली.

हेही वाचा -Women WC T२० : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 'महामुकाबला', ७५ हजार तिकिटांची विक्री

हेही वाचा -कोरोना व्हायरसमुळे आयपीएलवर टांगती तलवार, आरोग्यमंत्री टोपेंनी दिले संकेत

ABOUT THE AUTHOR

...view details