नवी दिल्ली - कोरोनामुळे भारतीय क्रिकेट संघ मार्चपासून एकही सामना खेळलेला नाही. या महामारीचा फटका बीसीसीआयलाही बसला आहे. यूएईत खेळवण्यात येणारी आयपीएल स्पर्धा ही एकमेव दिलासादायक बाब बीसीसीआयकडे आहे.
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयने प्रथमच कोरोनाच्या उद्रेकानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या ११ प्रशिक्षकांच्या वार्षिक कराराचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. या ११ प्रशिक्षकांमध्ये रमेश पोवार, एस.एस. दास, हृषिकेश कानिटकर, सुभ्रतो बॅनर्जी आणि सुजित सोमसुंदर हे पाच निवृत्त भारतीय खेळाडू आहेत.