साउथम्पटन- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारताकडून झालेल्या पराभवावर अफगाणिस्तान संघाचा कर्णधार गुलबदीन नैब नाराज आहे. पराभवानंतर बोलताना नैबने सांगितले की, आम्ही या सामन्यात भारताचा पराभव करण्याची संधी गमावली. अफगाणिस्तानने या स्पर्धेत आतापर्यंत सहा सामने खेळले असून एकही सामन्यात विजय मिळवला नाही.
शनिवारी बाउल येथे रंगलेल्या भारत विरुध्द अफगाणिस्तान सामन्यात, अफगाणिस्तानने नाणेफेक गमावली. त्यानंतर प्रथम गोलंदाजी करत भारताला निर्धारीत ५० षटकात ८ बाद २२४ धावांवर रोखले. मात्र, हे 'टार्गेट' अफगाणिस्तानच्या फलंदाजांना पूर्ण करता आले नाही. अफगाणिस्तानने संपूर्ण संघ २१३ धावांवर ढेपाळला.