महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 21, 2022, 7:32 PM IST

ETV Bharat / sitara

आशा आणि सकारात्मकतेचा संदेश अधोरेखित करणारे ‘अनपॉज्ड’ मधील गाणे ‘नया सफर’!

‘अनपॉज्ड: नया सफर' या वेब सिरीज मधील आशा आणि सकारात्मकतेचा संदेश अधोरेखित करणारे गाणे ‘नया सफर’ नुकतेच रिलीज करण्यात आले. सचिन-जिगर यांनी हे शीर्षक गीत संगीतबद्ध केले आहे. कौसर मुनीर हे नया सफरचे गीतलेखक आहेत. अमित मिश्रा यांनी हे गाणे गायले असून यातील शेखस्पीयरने रॅप म्हटले आहे. आशा आणि सकारात्मकता याच सूत्राभोवती हे कथानकही फिरते.

अनपॉज्डमधील गाणे नया सफ
अनपॉज्डमधील गाणे नया सफर

मुंबई- कोरोना काळात प्रसिद्धीझोतात आलेलं वेब सिरीज विश्व अजूनही जोरात घोडदौड करीत आहे. अनेक वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत असून कोरोना काळातील पाच कथानकं घेऊन एक सिरीज आलीय जिचं नाव आहे ‘अनपॉज्ड: नया सफर'. या वेब सिरीज मधील आशा आणि सकारात्मकतेचा संदेश अधोरेखित करणारे गाणे ‘नया सफर’ नुकतेच रिलीज करण्यात आले. सचिन-जिगर यांनी हे शीर्षक गीत संगीतबद्ध केले आहे. कौसर मुनीर हे नया सफरचे गीतलेखक आहेत. अमित मिश्रा यांनी हे गाणे गायले असून यातील शेखस्पीयरने रॅप म्हटले आहे. आशा आणि सकारात्मकता याच सूत्राभोवती हे कथानकही फिरते.

'अनपॉज्ड: नया सफर'मध्ये पाच अभिनव कथांचा समावेश असून त्या आशा, सकारात्मकता आणि नवीन आरंभाचा झरोका आहेत. त्या आपल्याला जीवन आणि भावनांना महत्त्व द्यायला शिकवतात. या कथांमधून प्रेम, उत्कंठा, भीती आणि मैत्री अशा अस्सल मानवी भावनांचे दर्शन घडते – शिखा माकन (गोंद के लड्डू), रुचिर अरूण (तीन तिगाडा), नूपुर अस्थाना (द कपल), अय्यप्पा केएम (वॉर रूम) आणि नागराज मंजुळे (वैकुंठ) या फिल्ममेकरनी कथा जिवंत केल्या आहेत.

गाण्याबद्दल अधिक माहिती देताना संगीतकार द्वयी सचिन संघवी आणि जिगर सरैय्या म्हणाले की, “‘नया सफर’ हे गाणे प्रेरणादायक आहे, ते ऐकणाऱ्याच्या मनात आशा आणि सकारात्मकता भरते. मनाला उभारी देते. कौसर मुनीर यांच्या शब्दांनी सुंदररितीने गीताचा आत्मा आणि सार पकडले आहे, तर अमित मिश्राच्या आवाजाने गाण्याला न्याय मिळाला आहे. शेखस्पीयरच्या रॅपने गाण्यात आणखी एका घटकाची भर घातली आहे. ‘नया सफर’चं हे गाणे कृतज्ञता आणि नवीन आरंभावर आधारलेले आहे. आपण सगळं गमावले असं जाणवण्याची वेळ जीवनात येते. आशेचा किरण हरवून जातो त्यावेळी मात्र आपण आत्मशक्ति आणि दृढतेवर विश्वास ठेवला पाहिजे. जीवनाला त्यामुळे चालना मिळत असते. कोणत्याही स्थितीशी मुकाबला करण्याची ताकद येते आणि एका विजेत्याप्रमाणे मार्गक्रमणा करणे शक्य होते. प्रेक्षक नया सफरची मजा घेतील ही आशा!”

हेही वाचा -शेट्टी कुटुंबात लग्नाची घाई! अथिया केएल राहुल, अहान तानिया 2022 मध्ये बोहल्यावर चढणार?

ABOUT THE AUTHOR

...view details