शशांक केतकर महाराष्ट्राचा ‘श्री’ म्हणून प्रसिद्धीस आला. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यावर (त्याच्या ‘जान्हवी’ सकट) प्रेम करीत आलाय. त्याने आजवर विविध मालिकांमध्ये नायक म्हणून लोकप्रियता मिळवली. पण सध्या झी मराठीवरील 'पाहिले न मी तुला' या मालिकेतील त्याने साकारलेल्या समर जहागीरदार या खलनायकाच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळतेय. त्याबद्दल विचारले असता शशांक म्हणाला की अभिनेता म्हणून मला विविध भूमिकांतून स्वतःलाच जोखायला आवडते.
‘पाहिले न मी तुला' या मालिकेत पहिल्यांदाच त्याने खलनायक साकारलाय आणि त्या अनुभवाबद्दल सांगताना शशांक म्हणाला, ‘माझ्यातला अभिनेत्याला वाव मिळण्यासाठी मला काहीतरी वेगळं करायचं होतंच. मला आधीपासूनच खलनायक साकारायचा होता. माझ्यासारख्या आखीव रेखीव चेहरा असणाऱ्याला अभिनेत्याला नायक म्हणूनच काम करावं लागतं की काय अशी मला भीती वाटू लागली होती. मला समर या भूमिकेसाठी विचारलं तेव्हा मी त्वरीत होकार कळवला.’
खलनायक साकारताना असणाऱ्या आव्हानांबद्दल शशांक म्हणाला की, ‘नाही म्हणायला थोडंफार आव्हानात्मक नक्कीच होत. कारण प्रेक्षक कसे प्रतिसाद देतील हे मनाच्या पाठीशी असतेच. खलनायक किंवा वाईट वागणारी माणसं ही शरीरानेच अवाढव्य वगैरे असतात असं नाही. वाईट वागणं ही एक वृत्ती असते. ही वृत्ती मला साकारायची आहे असा मी विचार केला, त्यामुळे गोष्टी माझ्यासाठी सोप्या झाल्या.