झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच दुसऱ्या पर्वाला देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच मालिकांचं शूटिंग बंद असल्याने काही काळ या मालिकेचं शूटिंग देखील बंद होतं. मात्र आता पुन्हा एकदा या मालिकेचे नवीन भाग प्रक्षेपित व्हायला लागल्यानंतर ही मालिका पुन्हा एकदा एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलेली आहे.
शेवंता अण्णा नाईकांशी लग्न करून नाईक वाड्यात प्रवेश करणार आहे. इकडे माईने घरात हळदी कुंकवाचा घाट घातलाय, इतक्यात हातात हिरवाचुडा,