महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'लागीर झालं जी' मालिकेचे ६०० भाग पूर्ण, कलाकारांनी साजरा केला आनंदोत्सव

'लागीर झालं जी' मालिकेच्या ६०० भागांच्या पूर्तीनिमत्त कलाकारांनी आनंदोत्सव साजरा केला. यानिमित्ताने कलाकारांनी एकत्र येत केक कापला

By

Published : Mar 20, 2019, 12:49 PM IST

लागीर झालं जी मालिकेचे ६०० भाग पूर्ण

मुंबई- ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेने गेल्या दीड वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील आज्या आणि शितलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रत्येकाला आपलीशी वाटावी अशी या मालिकेची कथा प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादासोबत आपले ६०० भाग पूर्ण करण्यात यशस्वी ठरली आहे.


'लागीर झालं जी' मालिकेच्या ६०० भागांच्या पूर्तीनिमत्त कलाकारांनी आनंदोत्सव साजरा केला. यानिमित्ताने कलाकारांनी एकत्र येत केक कापला. मालिकेत आज्याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास पूर्ण होताना दाखवला जात आहे. आज्या आणि शितल यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details