महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

लॉक डाऊन : पोलिसांच्या वागणुकीवर बॉलिवूड नाराज, सोशल मीडियावर व्यक्त केला राग - लॉकडाऊन

बॉलिवूड सेलेब्सनी सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. पोलीस ज्याप्रकारे वागणूक देत आहेत, त्यावर टीका करण्यात आली आहे.

BOLLYWOOD-CELEBS-
लॉकडाऊन

By

Published : Mar 27, 2020, 7:21 PM IST

मुंबई - देशभर सुरू असलेल्या लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलीस ज्याप्रकारे जनतेशी वागत आहेत, ते बॉलिवूड सेलेब्सना खटकले आहे. देशात अनेक ठिकाणी पोलिसांनी अत्यंत क्रूरपणे लोकांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे. यानंतर अनेक मोलमजुरीसाठी आलेले लोक आपल्या गावी परतत आहेत. वाहने नसल्यामुळे मुलाबाळांसह चालत जाणाऱ्या अशा अनेक लोकांना पोलिसांनी आपल्या लाठ्या काठ्यांनी सुजवले आहे. असाच एक व्हिडिओ शेअर करीत अनुराग कश्यप यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं., ''भयावह आहे.''

लेखक आणि कॉमेडियन वरुण ग्रोव्हरने हाच व्हिडिओ पोस्ट करीत विचारलंय, ''हा देश फक्त घरवाले आणि पॉवरवाल्यांचा आहे.'' त्याने लिहिलंय, ''एक मजूर आपल्या घरी ३०० किलोमिटर चालतही जाऊ शकत नाही? तो शहरातच भुकेने मरावा असे सरकारला वाटतेय का? तेही असा किटाणू ज्याच्याबद्दल त्याला माहितीही नाही.''

दिग्दर्शक संजय गुप्ता यांनीही राग व्यक्त करताना ट्विट केलंय, ''लाठी चार्जवाला काळ रोखा.''

थप्पड चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय. यात दोन पोलीस आवश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या एका बाईकस्वाराला मारत आहेत. सिन्हा यांनी विचारलंय, ''अशा प्रकारे कोणाला तरी मारणे कायदेशीर आहे का?''

अभिनेत्री रिचा चढ्डाने लिहिलंय, ''जीवघेण्या व्हायरसपासून वाचण्यासाठी लोकांना मरेपर्यंत मारणे याला काय अर्थ आहे?''

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टॅग करीत सोनू सूद यांनी लिहिलंय, ''यांना घरी पोहोचण्यासाठी मदत करा. बहुतांश मजूर यूपी आणि बिहारचे आहेत. यांना राहण्यासाठी घर आणि आपल्या परिवारापर्यंत पोहोचण्याची सुविधा पाहिजे. रस्ता शोधण्याची आवश्यकता आहे, सर.@CMOofficeUP @arvindkejriwal.''

कोरोना व्हायरसच्या इलाजामध्ये होणाऱ्या भेदभावावर निर्माता शेखर कपूर यांनी प्रश्न उपस्थित केलाय आणि आपली नाराजी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details